शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेच्या कमी टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:49 IST

ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही ठाण्यासारख्या सुशिक्षित मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत १.६४ टक्के घट झाली. तर कल्याण आणि भिवंडीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामुळे ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाण्यात ४९.२३ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत १.६४ टक्के कमी मतदान झाले तर कल्याणमध्ये ४५.२८ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ४२.८८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत २.३९ टक्के मतदान वाढले आहे. तर भिवंडीत ५३.०७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीत ५१.६२ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात १.४५ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता ठाण्यात १ लाख १२ हजार ६९७ मतांची वाढ झाली आहे. भिवंडीत १ लाख २७ हजार ७४ मतांची वाढ झाली आहे. तर कल्याणमध्ये ६४ हजार ३९५ एवढ्या मतांची वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ठाण्यातील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी (५०.८७ टक्के) मतदान केले होेते. यावेळी २३ लाख ७० हजार २७३ मतदारांपैकी ११ लाख ६६ हजार ८८६ मतदारांनी (४९.२३ टक्के ) हक्क बजावला. यावरून १.६४ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता १ लाख १२ हजार ६९७ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. ठाण्यात मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आले. कल्याण आणि भिवंडीमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती. अनेकांची नावेच गहाळ होती. त्यामुळे अनेक मतदारांची ईच्छा असूनही, त्यांना मतदान करता आले नाही.

मतदारयाद्यांमध्ये यावेळीही ठिकठिकाणी त्रुटी आढळल्या. एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. शिवाय वाढत्या उन्हामुळे आणि सलग आलेल्या पाच दिवसांच्या सुट्यांचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकVotingमतदानthane-pcठाणे