शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ड्रग्ज प्रकरणात सहभाग असेल तर बडतर्फ करा; पोलिस परिषदेत CM देवेंद्र फडणवीसांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 05:17 IST

महिला अत्याचार प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे. जप्त झालेली संपत्ती परत करण्याची तरतूद करावी, जेणेकरून सहा महिन्यांत मुद्देमाल परत दिल्याने पोलिस ठाणे रिकामे होईल, असेही मुख्यमंत्री  म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अमली पदार्थांच्या गुन्ह्यात पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळला तर त्याला थेट  बडतर्फ करण्यात यावे, अशी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिस परिषदेत केली. तसेच गुन्ह्यांचा तपास अधिक योग्य पद्धतीने होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या तसेच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

ठाण्याच्या रेमंड गेस्ट हाऊस येथील कम्युनिटी हॉलमध्ये राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था या विषयावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोईर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले. 

परिषदेत नव्याने तयार करण्यात आलेल्या तीन नवीन कायद्यांचे सादरीकरण झाल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.  सायबर गुन्हे, महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराबाबतही सादरीकरण केले. हे गुन्हे रोखण्यासाठी आणि उघडकीस आणण्याकरिता तसेच या गुन्ह्यात आरोपपत्र कसे लवकर दाखल होईल, यासंदर्भात चर्चा झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

परिषदेत ड्रग्जसंदर्भात कशी कारवाई सुरू आहे आणि ती यापुढे कशी झाली पाहिजे, या संदर्भातही चर्चा झाली. ड्रग्ज संदर्भातील कुठल्याही गुन्ह्यात कुठल्याही रॅकिंगचा पोलिस अधिकारी, कर्मचारी गुंतलेला असेल तर त्याला बडतर्फ केले जाईल, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

वेळेत आरोपपत्र दाखल करा

महिला अत्याचार प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे. जप्त झालेली संपत्ती परत करण्याची तरतूद करावी, जेणेकरून सहा महिन्यांत मुद्देमाल परत दिल्याने पोलिस ठाणे रिकामे होईल, असेही मुख्यमंत्री  म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस