शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे विघ्न; आरोग्य यंत्रणा झाली सज्ज

By अजित मांडके | Updated: August 23, 2022 16:09 IST

मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील १०० च्या आत आली असून मृत्यूची संख्या देखील शून्यावर  आली आहे.

अजित मांडकेठाणे : कोरोना कमी होत आहे, असे वाटत असतांनाच आता गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचे विघ्न पुढे येत असल्याचे दिसत आहे. मागील १५ दिवसात जिल्ह्यात ३ हजार ७४१ कोरोनाचे नवे रु ग्ण आढळून आले असून ३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यात स्वाइन फ्लुच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने गणोशोत्सावासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील १०० च्या आत आली असून मृत्यूची संख्या देखील शून्यावर  आली आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून तोंडावरचा मास्क देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी, ऑगस्ट २०२२ महिन्याच्या सुरुवातीला १०० च्या आत असलेली रुग्णांची संख्या थेट २०० च्या घरात पोहोचली आहे. तर, मृत्यूची संख्या कासववगतीने सुरु आहे. त्यामुळे ८ ऑगस्ट २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कोरोनाच्या ३ हजार ७४१ नव्या रुग्णांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ठाणे जिल्ह्यात मागील १५ दिवसात कोरोंचा प्रादुर्भाव देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना बाधित नव्या रुग्णांची संख्या ३ हजार ७४१ वर जावून पोहोचली आहे. तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १९ ऑगास्त रोजी सर्वाधिक ४४७ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, १६ ऑगस्ट रोजी सर्वात कमी ११८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

कोरोना हा आजार पूर्णतः संपुष्टात आला नाही. येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण आला आहे. त्यामुळे हा सण साजरा करीत असताना, नागरिकांनी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्या