शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भिवंडीत आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे प्रमाणपत्राचे वितरण

By नितीन पंडित | Updated: August 25, 2023 16:59 IST

आदिवासी समाज बांधवांना वन जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण होणे ही खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली ठरणार असून श्रमजीवी संघटनेने यासाठी निरंतर लढा उभारला.

भिवंडी: तालुक्यातील १२९ आदिवासी बांधवांना मंजूर झालेले वन हक्क पट्ट्यांचे वितरण शुक्रवारी आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी अमित सानप,तहसीलदार अधिक पाटील,नायब तहसीलदार चंद्रकांत राजपूत,श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिवासी समाज बांधवांना वन जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण होणे ही खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली ठरणार असून श्रमजीवी संघटनेने यासाठी निरंतर लढा उभारला आणि त्यामुळेच आज भिवंडी तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आलेले आहे असे आपल्या प्रास्ताविकात श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले असून शासनाने आदिवासी समाज बांधवांना दिलेल्या या वन पट्ट्यांचा वापर करून लाभार्थ्यांनी स्वतःची उपजीविका त्या ठिकाणी करायची असून एकाही लाभार्थ्याने आपले जमिनीचे पट्टे विकत अथवा भाड्याने कोणाला देऊ नयेत असे कुठे आढळून आल्यास ते वनहक्क पट्टे रद्द करण्याची शिफारस श्रमजीवी संघटना शासनाला करेल असा इशारा देखील भोईर यांनी यावेळी आदिवासी बांधवांना दिला आहे.

तर हे वन पट्टे मिळवून देण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे.आता आपण या वन पट्ट्यात आधुनिक शेती तसेच भात शेती, नागली, भाजीपाला व जंगल लाकूड लागवड करून वनाचे खरे राखणदार आपण आहोत हे शासकीय यंत्रणेला दाखवून द्यावे असे आवाहन आमदार शांताराम मोरे यांनी केले.