शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शहापूर तालुक्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:26 IST

दहिगाव ग्रा.पं.तील गावपाड्यांत टंचाई

- मनीष दोंदे खर्डी : उन्हाची काहिली वाढत चालली असतानाच खर्डी विभागातील दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील पळशीण, बोरीचापाडा, वझर, वडाचापाडा, बोराळा, शिशिवली आदी गावपाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.दहिगाव ग्रुपग्रामपंचायतीत जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असून या ग्रामपंचायतीचा विस्तार हा पाच गावे, त्याचे पाडे, जंगलपट्टी एवढा आहे. दहिगाव आणि पळशीण या दोन गावांसाठी ग्रा.पं.ने दहिगावजवळील तलावातून नळपाणीपुरवठा योजना बांधली आहे. मात्र, तलावातील पाणीसाठा फेब्रुवारी-मार्चपर्यंत असतो. त्यानंतर, तलावातील पाणी आटत जाते. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या ग्रामपंचायतीमध्ये सात विहिरी आहेत. त्यापैकी दहिगावच्या विहिरीला पाणी आहे. तर, उर्वरित सहा विहिरींमधील पाणी मार्च महिन्यापर्यंत पुरते. नंतर, त्याही कोरड्याठाक होऊन जातात.एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठापळशीण, वझर, बोरीचापाडा, वडाचापाडा येथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. बोरीचापाडा येथील महिलांना दीड ते दोन किलोमीटरहून पाणी डोक्यावरून वाहून आणावे लागते. ग्रामपंचायतीने यंदा शासनाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली. सध्या एक दिवसाआड तीन टँकरद्वारे पाणी विहिरीमध्ये टाकले जाते, मात्र तरीही हे पाणी पुरत नसल्याने महिलावर्ग त्रस्त झाला आहे. टँकरच्या फेऱ्या वाढवून दररोज पाणीपुरवठा केला जावा, असे स्थानिक महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले. जंगलातील वस्तीला गाडीरस्ता नसल्याने टँकर वस्तीपर्यंत पोहोचत नाही. ग्रामपंचायतीने छोटा टँकर नेण्याचा प्रयत्न केला होता, पण रस्ता नसल्याने पुन्हा टँकर पाठवणे शक्य नाही. पळशीण येथे एक खाजगी बोअरवेल असून येथील महिला या बोअरवेलचे पाणी विकत घेत असत. मात्र, २० दिवसांपासून त्याचेही पाणी कमी झाल्याने पाण्याची वणवण थांबता थांबत नाही. यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.शासनाने टँकर दररोज पाठवण्याची व्यवस्था करावी. एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने ते पुरत नाही. महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.- वैशाली घरत, सदस्य, ग्रामपंचायत, दहिगावआम्ही शासनाकडे जादा टँकरची मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फतही खाजगी टँकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- दीपक सापळे, उपसरपंच, ग्रामपंचायत, दहिगावआवश्यकतेनुसार टँकरचा पाणीपुरवठा वाढवला जाईल.- एम.जी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर पंचायत समिती

टॅग्स :water shortageपाणीटंचाई