शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत घोडेबाजाराला वेग

By admin | Published: March 08, 2016 1:38 AM

पालघरच्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुक उद्या (मंगळवारी) होत असून नऊ जागांसाठी बारा उमेदवारामध्ये लढती रंगणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षानी ही निवडणुक गांभीर्याने घेतली असून

पालघर : पालघरच्या जिल्हा नियोजन समितीची निवडणुक उद्या (मंगळवारी) होत असून नऊ जागांसाठी बारा उमेदवारामध्ये लढती रंगणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षानी ही निवडणुक गांभीर्याने घेतली असून आज दिवसभर मतदाराच्या फोडाफोडीसाठी अनेक बैठका रंगल्याचे चित्र दिसून येत होते.पालघर जिल्हापरीषदेच्या ५७ सदस्यापैकी, भाजपाकडे २१ सदस्य, शिवसेनेकडे १५ व बंडखोरीकरून विजयी झालेल्या अपक्ष असे १६ उमेदवार असून बहुजन विकास आघाडीकडे १०, माकपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व काँग्रेसचा १ असे बलाबल असून सर्व पक्षांनी एकत्र येत १३ जागावर बिनविरोध निवड करून घेतली.जिल्हापरिषद गटामध्ये पाच जागासाठी सहा उमेदवार रिंगणात असून भाजपाचे तीन व शिवसेनेच्या दोघांचा अंतर्भाव आहे. याच गटामधून राष्ट्रवादीच्या दामोदर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यातून दामोदर पाटील यांचे नाव राष्ट्रवादीने सुचविले नसल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे असून राष्ट्रवादीने काशिनाथ चौधरी यांना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उभे केले आहे. राष्ट्रवादीच्या या पावित्र्यामुळे जि. प. गटातून निवडणुक होत आहे.महानगरपालिका गटामध्ये तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असले तरी वसई-विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीकडे ११५ नगरसेवकांपैकी १०९ नगरसेवक आहेत. त्यामुळे बविआचा एकतर्फी विजय होणार आहे. तर नगरपालिका गटामध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आणि शिवसेनेचे अतुल पाठक या पालघर नगरपरिषदेतील नगरसेवकांमध्ये सरळ सरळ लढत होत असून पालघर, जव्हार व डहाणू मधील एकूण ५८ नगरसेवक मतदार असल्याने राष्ट्रवादीपक्षाकडे २९ नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे दोन असे एकूण ३१ संस्थाबळ तर सेनेकडे २२ व भाजपाकडे पाच असे २७ चे संख्याबळ आहे. परंतु राष्ट्रवादीला पाठींबा देण्याबाबत काँग्रेसच्या नगरसेवकांना अजुन कुठल्याही सुचना आल्या नसल्याची माहिती काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. त्यामुळे काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्यात सेना-भाजपा उमेदवार यशस्वी झाल्यास दोघांचे समसमान संख्याबळ होणार आहे. त्या दृष्टीने आज सकाळपासून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. (वार्ताहर)