शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

जून महिन्यात जिल्ह्याला मिळाल्या सव्वाचार लाख लसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:27 AM

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ ...

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ जिल्ह्यातील सर्वच पालिका प्रशासनावर ओढवली असली तरी एकट्या जून महिन्यात नऊ वेळा लस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये तीन लाख ८४ हजार २०० कोविशिल्ड, तर ४१ हजार ५६० कोव्हॅक्सिन अशा चार लाख २५ हजार ७६० लसींचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी कोरोना या आजाराने पुन्हा आपले डोके वर काढले होते. मात्र, मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यातही आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत आजही चढउतार होत आहे. त्यात आता, पुन्हा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिक लसीकरण केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र, अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.

दुसरीकडे, एकाच दिवशी विक्रमी लसीकरण करणाऱ्या ठाणे महापालिकेला लसींच्या साठ्याअभावी केंद्रे बंद करण्याची वेळ ओढवलेली आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी महापालिका क्षेत्रांमध्येदेखील अपुऱ्या लसींमुळे केंद्र बंद ठेवली आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी तर लस मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात एकट्या जून महिन्यात नऊ वेळा लस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन लाख ८४ हजार २०० कोविशिल्ड, तर ४१ हजार ५६० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.

जिल्ह्यात अवघे २२ लाख लसीकरण

जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात २१ लाख ९५ हजार १४८ जणांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १७ लाख ७० हजार ६४५ जणांना पहिला डोस तर, चार लाख २४ हजार ५०३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पाहता व तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलेेेेेेेेेे आहे.