शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय राजवट नको, निवडणुका घ्या! 

By सदानंद नाईक | Published: November 21, 2022 4:34 PM

उल्हासनगर महापालिकेत गेल्या ८ महिन्यापासून प्रधासकीय राजवट लागली असून आयुक्ती पदी आलेले अजीज शेख यांनी सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामाचा धडाका सुरू केला.

उल्हासनगर : राज्यासह जिल्ह्यातील महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने विकास कामे ठप्प पडून मनमानी सुरू झाल्याने, निवडणुका घेण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव व महापालिकेचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री यांनी राज्य शासनासह जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तहसिलदार आदिना केली. 

उल्हासनगर महापालिकेत गेल्या ८ महिन्यापासून प्रधासकीय राजवट लागली असून आयुक्ती पदी आलेले अजीज शेख यांनी सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामाचा धडाका सुरू केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री यांनी मात्र लोकशाहीत मतदारांचा हक्क न डावलला जात असल्याचा आरोप केला. शहर विकासासाठी व लोकशाही जिवंत राहण्यासाठी महापालिका सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्तासह जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय, तहसीलदार आदींना निवेदनात द्वारे केली. 

महापालिकेच्या कामकाजावर लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नसल्याने, प्रशासकीय राजवट लागलेल्या महापालिका कारभारात अनागोंदी कारभार सुरू झाला. यामुळे यातून मोठे घोटाळे बाहेर येणार असल्याची शक्यता गंगोत्री यांनी पत्रकार यांच्याकडे व्यक्त केली. हळूहळू राज्यातील सर्वच भागातून अशी मागणी सुरू होणार असून केंद्र व राज्य शासन यांना निवडणूक घेण्यास भाग पडणार आहे.

प्रशासकीय राजवट लोकशाहीला घातक असून सत्ताधारी जाणीवपूर्वक महापालिका सार्वत्रिक निवडणूका टाळत असल्याचा आरोपही गंगोत्री यांनी केला. महापालिकेत सर्व निर्णय आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा अधिकारी, शहर अभियंता, नगररचनाकार आदीजन घेत आहेत. महापालिका कारभारा विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळत नसून गुपचूप सर्व कारभार हाकलला जात असल्याचा आरोप गंगोत्री यांचा आहे. 

अवैध बांधकामे, पाणी टंचाई, साफसफाई, उघड्या वाहणारे कचऱ्याची वाहतूक, डम्पिंग ग्राऊंड प्रश्न, रस्त्याची दुरावस्था आदी अनेक समस्या आ वासून उभ्या टाकल्या. असेही त्यांची म्हणणे आहे. आज राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीची मागणी होते. यानंतर राज्यातून होणार असल्याचे संकेतही दिले.

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022