शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

इंग्रजांची स्तुती केली म्हणून गांधीजींच्या राष्ट्रप्रेमावर आपण शंका घेतो का?: कपिल पाटील

By नितीन पंडित | Published: April 07, 2023 3:28 PM

सावरकरांचे विचार समाजात पोहचविण्यासाठी हि गौरव यात्रा...केंद्रीय मंत्री कपिल पाटील

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महात्मा गांधीजींनी पहिल्या महायुद्धात इंग्रजांची स्तुती करीत तरुणांना सैन्यात दाखल होण्याचे आवाहन केले होते म्हणून काय आपण त्यांच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेतो का? तर त्यामागे त्यांचा उद्देश शुद्ध होता. इंग्रजांनी पहिल्या महायुद्धात भारताने सहकार्य केल्यास देशाला लवकर स्वतंत्र मिळेल ही भावना होती,तशीच भावना स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागण्या मागचा हेतू हा कारागृहात बंदी राहून देश स्वतंत्र करता येऊ शकत नाही जर बाहेर राहिल्यास स्वातंत्र्यलढा अधिक जोमाने उभा करता येऊ शकतो आणि याच भावनेने त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असे वक्तव्य केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.शुक्रवारी ते काल्हेर येथे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित सावरकर गौरव यात्रेच्या बाईक रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष पि के म्हात्रे,हरिश्चंद्र भोईर,राजेंद्र भोईर,श्रीधर पाटील,निलेश गुरव यांसह मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.काल्हेर ते कोनगाव या दरम्यान आयोजित या रॅलीत सावरकर चित्ररथ सहभागी केले होते. काँग्रेस पक्षाचे नाव न घेता काही तथाकथित पक्षातील स्वतःला नेते म्हणून घेणारी लोकं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जी टीका करतात ती चुकीची असून समाजा मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम या तथाकथित पक्षातील मंडळींकडून केला जात आहे अशी टीका देखील पाटील यांनी केली आहे.आणि त्याच करता भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या वतीने महाराष्ट्रात सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेंचा आयोजन करून सावरकरांचा विचार सावरकरांचा इतिहास हा तरुणांमध्ये सर्व समाजामध्ये पोहोचवण्याचं काम सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून केलं जात असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.सावरकरांनी त्यांच्या राष्ट्र कार्याने स्वतःची दहशत निर्माण केली होती.

आणि त्या मुळे हे तथाकथित पक्षातील नेते मंडळी भयग्रस्त झाले असून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी आम्ही सावरकर या माध्यमातून समाजामध्ये वावरत असताना त्यांची सुद्धा दहशत तथाकथित पक्षाची नेत्यामंडळींना नक्कीच राहील.सावरकरांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केलेली हि दहशत आहे,त्यामुळे तथाकथित पक्षातील लोक सावरकरांचा वारंवार अपमान करून सावरकरांचे विचार संकुचित करण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही शेवटी पाटील यावेळी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील