शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

"ठाण्यातील शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशावर की महापौरांच्या विचारसरणीवर चालते?" 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 2:41 PM

Thane Shivsena And NCP : आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये नैसर्गिक युती असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. 

ठाणे (प्रतिनिधी) - एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असतानाच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे शिवसेना-भाजप नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लागावला आहे. 

माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा इशारा महापौर म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये नैसर्गिक युती असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. 

आनंद परांजपे म्हणाले की,  काल ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची महासभा संपन्न झाली. त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे त्यांच्यातील अहंपणा आणि अहंकार आजही त्यांच्यातून गेलेला नाही. खरंतर त्यांची महापौरपदाची अडीच वर्षांची कारकिर्द आज संपली आहे. कालदेखील महासभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढीत असताना, शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असल्याचे संभाषण करीत स्वबळाचा नारा दिला. आपणाला तर आश्चर्य वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकीकडे म्हणतात की 30 वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. सापाला आम्ही दूध पाजले आणि ठाण्याचे महापौर हे सेना-भाजपची नैसर्गिक युती आहे अन् हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा प्रकारचे भाष्य करीत आहेत. याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करायला हवाय की, “ठाण्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालते की शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते”

गुरुवारी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. आम्ही त्याचे स्वागतच करतो. किंबहुना, त्यांना शुभेच्छाच देतो. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, जिथे शक्य आहे; तिथे महाविकास आघाडी झालीच पाहिजे’ असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने महाविकास आघाडी ठाण्यात गठीत झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. आमचादेखील तोच प्रयत्न आहे. उद्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला तर आम्ही त्याचे स्वागत करू. नशिबाने नरेश म्हस्के असे म्हणाले नाहीत की, 142 पैकी 142 नगरसेवक आमचेच निवडून येतील; कारण, त्यांचा चाणक्याचा कलियुगातील नारद कधी झाला, हे त्यांना समजलेलेच नाही, असा टोलाही परांजपे यांनी लगावला. 

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे