शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

अन्यायकारक वाहतू बदल ठाणेकरांच्या माथी मारू नका, मनसेचा वाहतूक पोलीस विभागाला इशारा  

By अजित मांडके | Published: April 27, 2023 7:00 PM

केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे.

ठाणे : रस्ते दुरुस्तीसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक बदल केले जात आहेत. तसेच शहरातील काही ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्तेच बंद करण्यात आले आहेत. परंतु वाहतूक बदलाच्या या मनमानी मुद्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे. यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. परंतु तसे न झाल्यास या अन्याया विरोधात व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी मुंब्रा बायपास बंद करण्यात आला. त्यानंतर ही दुरुस्ती होत असतांना, साकेत आणि खारेगाव पुलावरील एक मार्गिका टप्याटप्याने दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे माजिवडा ते घोडबंदर पर्यंत आणि मुंबईवरुन येतांना नितिन कंपनीच्या बाजूपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे ठाणेकर वैतागला आहे. तसेच शहराच्या इतर भागात देखील रस्ते दुरुस्तीची कामे एकाच वेळेस हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे देखील शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आता ठाणे शहरातील जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथील नवीन सब वे व भास्कर कट ते नवीन कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरुवातीस खोदकाम करून डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पयार्यी मागार्ने वळविण्यास सुरवात झाली आहे. २६ एप्रिल ते २१ मे पर्यंत हे काम होणार असल्याने येथील वाहतूकीत देखील बदल करण्यात आला आहे.परंतु एकाच वेळेस अशा पध्दतीने शहरातील विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने वाहतूकीत बदल केले जात असतांना ठाणेकरांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

वाहतूक बदल करीत असतांना काही ठराविक आपल्याला अनुकुल असलेले नागरीक बैठकीला बोलावून वाहतूक बदल केले जात आहेत. परंतु ते सर्वसामान्यपर्यंत पोहचत नसल्याचे मनसेचे म्हणने आहे. त्यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठकीचे आयोजन करावे, त्या ठिकाणी सर्वांची मते घ्यावीत त्यानंतरच वाहतूक बदल करावेत अशी सुचना मनसेने केली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नयेत असा इशाराही मनसेने दिला आहे. त्यामुळे वाहतूक बदलाची नव्याने बैठक घेऊन त्यानंतरच वाहतूक बदल करावेत, अन्यथा व्यापक आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तांना दिले आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाthaneठाणे