शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
3
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
4
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
5
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
6
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
7
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
8
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
9
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
10
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
11
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
13
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
14
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
15
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
16
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
17
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
18
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
19
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
20
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता

डॉ. बाबासाहेबांचा ‘या’ खुर्चीत बसून न्यायनिवाडा; १९४१ मध्ये पाणी भरण्यावरून झाला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 9:18 AM

आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते

प्रकाश जाधवमुरबाड : मुरबाड तालुक्यात १९ मे १९४१ रोजी पाणी भरण्यावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामोपचाराने हा वाद मिटविला. ज्या खुर्चीत बसून डॉ. बाबासाहेबांनी हा वाद सोडविला ती खुर्ची आजही शहरातील कौशिक अनंत भराडे यांच्या घरी जतन करून ठेवण्यात आले आहे. ही खुर्ची तालुक्यात सातत्याने समानतेची प्रेरणा देते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २० मे १९४१ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी मुरबाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे राहणारे अनंत धोंडू भराडे यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा गोविंद बाळू थोरात यांच्याही अंगणात ते आले होते. भाऊराव कृष्णराव तथा दादासाहेब गायकवाड हेदेखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

आमचे वडील अनंत भराडे यांनी वकिली केली होती. त्यामुळे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात होते. आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते. त्यांनी याच खुर्चीवर बसून न्यायनिवाडा केला होता. - कौशिक अनंत भराडे, मुरबाड.

१९ मे १९४१ रोजी फौजदारांची, गायकरांची विहीर असलेल्या जागेत पाणी भरण्यावरून अनुसया दोंदे व सोनाबाई घायवट यांचा काही सवर्णांशी वाद झाला होता. हा वाद विकोपास जाऊ नये म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेबांनी मुरबाडला येऊन हा वाद मिटवला. हा इतिहास ‘माता भीमाई’ पुस्तकाचे लेखक  योगेंद्र बांगर यांनी मुरबाड इतिहास व संदर्भ या ग्रंथात संकलित केला आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर