शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

पिण्याचे पाणी, शेतीला गंभीर धोका

By admin | Published: July 05, 2017 6:19 AM

अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा कचरा टाकल्याचे समोर आले आहे. चिखलोली प्रकरणात कारवाई झाल्यावरही कंपन्यांना अजून धाक बसला नसल्याचेच यातून उघड झाले. या भागातील काही कंपन्या रासायनिक सांडपाणीही जमिनीत मुरवत असल्याचे उघड झाले असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, शेती यांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या अनंतनगर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखानदारांनी त्यांच्या कंपनीतला कचरा हा प्रक्रिया केंद्रावर न टाकता एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेवरच फेकणे सुरू केले. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार समोर आल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाने दोषी कंपनीवर कारवाईही केली. त्या घटनेला १५ दिवसही उलटत नाहीत, तोच पुन्हा या भागातील जीआयपी टँक परिसरात रासायनिक कचरा आढळला आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंते आणि अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कचऱ्याची पाहणी केली. येथे अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात असल्याचेही यावेळी समोर आले. त्यामुळे या प्रकरणात एमआयडीसीने पुढाकार घेत कंपन्यांत जागृती करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी केले. कंपन्यांकडून वारंवार वेगवेगळ््या ठिकाणी टाकला जाणारा कचरा थांबवण्यासाठी त्यांना सूचना देऊन त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा देण्याचे आदेशही त्यांनी दिले. याबाबत विशेष कार्यक्र म राबवण्यासाठी कंपन्या, पालिका प्रशासन, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि समाजसेवी संस्थांना एकत्र बोलावून बैठक करण्याचेही आदेश त्यांनी दिले. येत्या सोमवारी याबाबत संयुक्त बैठक पार पडणार आहे. ही तपासणी सुरू असताना काही कंपन्या बेकायदा जमिनीत सांडपाणी मुरवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाण्याचे आणि कचऱ्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला धोकाअंबरनाथ परिसरातील दोन धरणे रासायनिक कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचा धोका धडधडीतपणे समोर आला आहे. या पाण्याचे शुद्धीकरण होत असले, तरी त्यातून सर्व रसायने नष्ट होतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सुरक्षा नसलेली धरणे आणि त्यांच्या परिसरात कोणाचाही होणारा वावर किती धोकादायक बनू शकतो, ते समोर आले.