शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

कारखानाबंदी उठवल्याने प्रदूषणास मुभा

By admin | Published: August 12, 2016 2:13 AM

रासायनिक कारखान्यांतून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे डोंबिवलीकर त्रासलेले असतानाच त्यावर तोडगा काढून दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कारखानदारांचे हित

डोंबिवली : रासायनिक कारखान्यांतून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे डोंबिवलीकर त्रासलेले असतानाच त्यावर तोडगा काढून दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कारखानदारांचे हित जोपासत त्यांना पुन्हा प्रदूषणाच्या गर्तेत ढकलणारा निर्णय घेत एक प्रकारे कारखानदारांना प्रदूषणासाठी मुभा दिल्याचा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली-अंबरनाथमधील कारखानाबंदी उठवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय डोंबिवलीत सुरू करावे, या कार्यालयातून २४ तास सेवा पुरवली जावी, एखादी घटना अपरात्री घडल्यास तेथे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकारी उपलब्ध असावा, औद्योगिक परिसरात वेगळे अग्निशमन केंद्र हवे, प्रदूषण नियंत्रणाचे कायदे कडक व्हावेत, औद्योगिक परिसरात येणाऱ्या रसायनांच्या टँकरची नोंद व्हावी आणि ते कुठून-कुठे जातात ते निश्चित करावे, उतरवलेल्या रसायनांची नोंद व्हावी, एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही लावण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी, प्रदूषणाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून घ्यावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात कारखाना निरीक्षक वाढवावे, रासायनिक व कापड उद्योग प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर वेगवेगळी प्रक्रिया करावी, एमआयडीसी-प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य संचालनालय आणि पोलिसांत समन्वय हवा, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित व्हाव्या, असे त्यांनी सुचवले.