शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ओहटीमुळे ठाणे खाडीत अनधिकृत रेती काढणारे जहाजं आडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 15:16 IST

 येथील सुस्तावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या आधीही कधी अशी बेधडक कारवाई झाली नाही. रेती उत्खनन करताना टाकलेल्या धाडीत जहाजांवरील कर्मचारी नेहमी प्रमाणे पळून गेल्याचा गुन्हा जवळच्या पोलिसात दाखल होतो. मात्र कर्मचारी किंवा त्यांचा मोरक्याच्या मुसक्या आजूनही बांधता आलेल्या नाही. दुर्लक्षितपणा, डोळेझाक व निष्काळजीतून रेती माफिये मोठ्याप्रमाणात फोफावले आहेत.

ठळक मुद्देबेसुमार रेती उत्खननामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आदी ठिकाणच्या खाडीतील कांदळवनांचे जंगलच्या जंगल नष्ठ झाल्याचे वास्तव मुंब्राजवळील फास्ट ट्रॅकला जागून असलेले कांदळवन नष्ठ करण्यासह खाडीचा प्रवाह देखील वळवून रेती उत्खननयेथून धावणारे मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि फास्ट लोकलच्या रेल्व रूळास धोकाओहटी सुरू झाली आणि खाडीतील पाणी कमी झाले. यामुळे मुंब्रा, दिवा आणि कोपरखाडीत डोझर, सक्शनपंप आणि रेतीचे जहाजं आडकले

ठाणे : जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या खाडीत रात्री बेसुमार रेती उत्खनन सुरू आहे. शनिवारी देखील सक्शनपंपव्दारे मनमानी रेती काढली जात होती. दरम्यान ओहटी सुरू झाली आणि खाडीतील पाणी कमी झाले. यामुळे मुंब्रा, दिवा आणि कोपरखाडीत डोझर, सक्शनपंप आणि रेतीचे जहाजं आडकले. रविवारी खाडीत दिवसभर अडकलेल्या या जहाजांवर मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहे.लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात आहे. जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात आडकले आहे. या कालावधीत रेती माफियांनी खाडीतील रेतीचे मनमानी उत्खनन सुरू केले आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या खाडीत रात्रीच्या सुमारास बेसुमारे रेतीचे उत्खन केले जात आहे. याप्रमाणेच शनिवारी रेती उत्खनन करण्यासाठी खाडीत असताना मध्यरात्रीनंतर ओहटी सुरू झाल्यामुळे पाणी कमी झाले. यामुळे रेती काढण्यासाठी लवाजम्यानिशी खाडीत उतरलेल्या या जहाजांना खाडी किनारा गाठता आला नाही. रविवारी देखील ते खाडीत आडकलेले पाहायला मिळाले.कोपर खाडी व मुंब्यातील खाडीत रेतीमाफियांचीही जहाजं, डोझर आणि सक्शनपंप आडकल्याचे दिवसभर पाहायला मिळाले. सध्याच्या आचारसंहितेचा व अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा रेती माफियांकडून घेतला जात आहे. यास प्रतिबंध घालण्यासाठी तहसिलदार व जिल्हा अधिकारी कार्यालयात असलेल्या रेतीगट शाखा नेहमीप्रमाणे डोळझाक करीत आहेत. अन्य जिल्ह्यातील नदीत रेती उत्खनन करणाऱ्या जहाजांवर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. नदीत जहाज दिसतास जिलेटनच्या सहाय्याने त्यांचा स्फोट करून जहाजं निकामी करीत असल्याचे वास्तव दिसून येत आहे.

     येथील सुस्तावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या आधीही कधी अशी बेधडक कारवाई झाली नाही.रेती उत्खनन करताना टाकलेल्या धाडीत जहाजांवरील कर्मचारी नेहमी प्रमाणे पळून गेल्याचा गुन्हा जवळच्या पोलिसात दाखल होतो. मात्र कर्मचारी किंवा त्यांचा मोरक्याच्या मुसक्या आजूनही बांधता आलेल्या नाही. दुर्लक्षितपणा, डोळेझाक व निष्काळजीतून रेती माफिये मोठ्याप्रमाणात फोफावले आहेत.

     बेसुमार रेती उत्खननामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आदी ठिकाणच्या खाडीतील कांदळवनांचे जंगलच्या जंगल नष्ठ झाल्याचे वास्तव आजही दिसून येत आहे. एवढीच काय तर मुंब्राजवळील फास्ट ट्रॅकला जागून असलेले कांदळवन नष्ठ करण्यासह खाडीचा प्रवाह देखील वळवून रेती उत्खनन झाल्याचे आजही दिसत आहे. यामुळे येथून धावणारे मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि फास्ट लोकलच्या रेल्व रूळास धोका निर्माण झाला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या परिसरातील खाडीत रेती उत्खनन कायमचे बंद करून ठिकठिकाणी कांदळवन वाढवण्यावर भर देण्याची अत्यंत गरज आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी