शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे ठाण्यातील शिवसेनेचे सुमारे ४५ नगरसेवक सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:23 IST

दिल्लाला जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते विमान पुन्हा मुंबईत उतरविण्यात आले. सुदैवाने या विमानातून दिल्लीला संसदेचे कामकाज पाहण्यासाठी जात असलेल्या ठाण्यातील ४५ शिवसेना नगरसेवक हे वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे बचावले आहेत.

ठळक मुद्देसंसदेचे कामकाज पाहण्यासाठी निघाले होते नगरसेवकविमानात झाला होता तांत्रिक बिघाड

ठाणे - दिल्ली येथे संसदेचा दौरा करायला निघालेल्या ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांचा जीव थोडक्यात बचावला आहे. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान गो एअर कंपनीच्या विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर ३५ ते ४० मिनिटांचे अंतर कापल्यानंतर विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सावधगिरीचा उपाय म्हणून हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. विमानामध्ये तब्बल ४० ते ४५ नगरसेवक आणि इतर पदाधिकारी प्रवास करत होते. प्रवास करत असलेल्या नगरसेवकांनी मुंबई विमानतळावर उतल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले.                   ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासाठी संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे पाहण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये ४० ते ४५ नगरसेवक प्रवास करत होते. स्वत: खासदार या विमानांमधून प्रवास करत नव्हते. तर शिवसेनेची एकही महिला नगरसेविका देखील सुदैवाने या विमानामध्ये प्रवास करत नव्हती.सकाळी विमानाने व्यविस्थत उड्डाण घेतल्यानंतर तब्बल ४० मिनिटांनी विमानामध्ये काही तरी बिघाड झाला असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. मात्र नेमका काय तांत्रिक बिघाड झाला आह यांची माहिती देण्यात येत नव्हती अशी प्रतिक्रिया या विमानामध्ये प्रवास करणारे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी दिली आहे. त्यानंतर एका इंजिनामध्ये बिघाड झाल्याने ते पुन्हा मुंबईत उतरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुदैवाने वैमानिकाने वेळेत सतर्कता दाखवल्यामुळे आमचे प्राण वाचले असल्याचे त्यांनी सांगितले. तर अचानक तांत्रिक बिघाड झाला आहे एवढीच माहिती आम्हाला देण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबईला उतरवण्यात आले असल्याचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील आपण या दौऱ्याला जाणार होतो, मात्र काही कामानिमित्त आपल्याला जाण्यास जमले नसले तरी या प्रकारची चौकशी होईल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रि या त्यांनी दिली आहे. दरम्यान दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हे सर्व नगरसेवक दिल्लीला पोचले असल्याची माहिती दौऱ्यातील नगरसेवकांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात या विमानाचे लँडीग एमरजेन्सी करण्यात आलेले नसल्याची माहिती गो एअर कंपनीकडून देण्यात आली आहे. केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून विमान सुखरुपपणे पुन्हा मुंबईला उतरविण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShiv Senaशिवसेना