शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

डम्पिंग बंद, पण आग लागण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:28 AM

कल्याण : येथील पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील वाडेघर डम्पिंगला शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. चार तासांत आगीवर नियंत्रण ...

कल्याण : येथील पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील वाडेघर डम्पिंगला शनिवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. चार तासांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. डम्पिंगवर कचरा टाकणे नुकतेच कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी जोपर्यंत कचरा पूर्णपणे हटविला जात नाही, तोपर्यंत कचऱ्याला आगी लागण्याचे सत्र सुरूच राहणार असल्याचे बोलले जाते.

दरवर्षी उन्हाळ्यात डम्पिंगला आग लागते. यंदाही हे सत्र कायम राहिले. १६ मार्चला डम्पिंगला आग लागली होती. त्यावेळी सुमारे तीन ते चार एकर परिसरातील कचऱ्याला आग लागल्याने, डम्पिंगला लागून असणारा सीएनजी पंपही बंद ठेवण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीचा धूर वाऱ्याबरोबर सभोवतालच्या परिसरात पसरला होता. दरम्यान, शनिवारी रात्री पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या बाजूस ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या आधी त्या ठिकाणी जाण्यास रस्ता नव्हता. परंतु केडीएमसीने अग्निशमन विभागाचे वाहन जाईल, तेवढा रस्ता नुकताच बनविल्याने, त्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने नेऊन आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविणे शक्य झाले. पाच बंबांच्या साहाय्याने आग विझविल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

---------------------------------------------

तक्रारी कागदावरच

१६ मार्चला डम्पिंगला आग लागली होती. रात्री ९.३०च्या सुमारास डम्पिंगला लागलेली आग खोलवर गेल्याने पुढे पाच दिवस धुमसतच होती. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविल्यानंतर डम्पिंगच्या परिसरात डिझेल भरलेल्या बाटल्या निदर्शनास आल्या होत्या. सहसा कोणालाही दिसणार नाहीत, अशा पद्धतीने त्या बाटल्या कचऱ्यात ठेवण्यात आल्या होत्या. यावरून आग कोणीतरी मुद्दाम लावत असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मनपाने तक्रार दाखल केली आहे. यात प्रामुख्याने कचरावेचक व भंगारवाल्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे, परंतु दोन महिने उलटूनही कारवाई झालेली नाही. यापूर्वीही प्रशासनाने आगीप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीही तपासाविना पडून आहेत.

------------------------------------------------------