शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमतीत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. मागच्यावर्षी वाढलेले खाद्यतेलाचे भाव ...

मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. मागच्यावर्षी वाढलेले खाद्यतेलाचे भाव जुलैपर्यंत आणखी वाढतील, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र जूनमध्ये भाव कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

खाद्यतेलात शेंगदाणा तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आता खाद्यतेलाचे दर कमी झाले असले तरी, अन्य तेलाच्या तुलनेत शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. सूर्यफूल, सोयाबीन, पाम आणि राइस ब्रॅन या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्यातही राईचे तेल हे सगळ्य़ात जास्त महाग होते. त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात उत्तर भारतीय करतात. महाराष्ट्रीय लोक शेंगदाणा तेलाला आधी प्राधान्य देतात. अन्य सूर्यफूल, राइस ब्रॅन यांना नंतरचे प्राधान्य आहे. मध्यमवर्गीय ग्राहक सोडला, तर सगळीकडे रिफाइंड तेल खाण्यावर जास्त भर असतो. त्यातही सामान्यांची पसंती ही पाम तेलाला अधिक असते.

कोरोना काळात अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून केले गेले. त्यात पाम तेलाचे एक ते दोन लिटरचे पॅकेट जास्त खरेदी करून दिले गेले. त्यामुळे पाम तेलाची विक्री जास्त झाली होती. कोरोना काळात नागरिकांच्या हातचे काम गेले. अनेकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे सरकारने जीवनाश्यवक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले पाहिजेत, अशी माफक अपेक्षा होती. कोरोना काळात जीवनाश्यक वस्तूंचे भाव वाढले. त्यात खाद्यतेलही महागले होते. त्यामुळे महिलांचे घरचे बजेट कोलमडले होते. खाद्यतेलावरील कर कमी केल्याने आता कुठे किमती घसरल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मात्र कमी झालेले भाव यापुढेही स्थिर राहावेत, अशी माफक अपेक्षा महिला वर्गाकडून केली जात आहे.

-------------------------

गृहिणींना मिळाला थोडासा दिलासा

कोरोना काळात तेलाला भाववाढीची चांगलीच फोडणी बसली होती. त्यामुळे आमच्या घरातील तेलाचे बजेट कोलमडले होते. त्यामुळे तेल वापरताना हात आखडता घेतला जात होता. आता तेलाचे भाव कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुन्हा तेलाचे भाव वाढविले जाऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिक सरकारकडून व्यक्त करत आहेत.

---------------------

शेतकरी प्रतिक्रिया...

१. आमची नाशिकला भुईमुगाची शेती आहे. शेतातील भुईमूग सुकवून त्यानंतर त्यातील दाणे काढून शेंगदाणा तेलासाठी त्याचा उपयोग करतो. मात्र शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे या भाववाढीचा आणि भाव कमी केल्याचा आम्हाला काहीएक फायदा झाला नाही.

- सुरेश निचळ

२. आम्ही सूर्यफुलाचे पीक घेतो. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. मागच्यावर्षी कोरोना काळात सूर्यफुलाच्या तेलाचे भाव वाढले होते. ते जुलैमध्येही वाढतील, अशी अपेक्षा होती. पण आता कमी झाल्याने आमच्या पदरी पुन्हा कमीच पैसे मिळणार आहेत.

- दाजीबा सोपान

---------------------------

प्रति लिटर तेलाचे आताचे दर...

सूर्यफूल - १५५ रुपये

सोयाबीन - १३५ रुपये

शेंगदाणा - १६५ रुपये

पाम - ११५ रुपये

राइसब्रॅन - १५५ रुपये

---------------------

याआधीचे दर...

सूर्यफूल - १७५ रुपये

सोयाबीन - १५९ रुपये

शेंगदाणा - १६० रुपये

पाम-१३५ रुपये

राइसब्रॅन-१८० रुपये

----------------------