शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भिवंडीत रस्त्यावरील मुलांसाठी शिक्षणाची गाडी सुरू

By नितीन पंडित | Updated: March 10, 2023 19:14 IST

भिवंडी :दि.१०- शासन शिक्षणबाह्य मुलांना शालेय वातावरणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असतानाही अनेक स्थलांतरीत मजुरांची मुले शाळेपासून दूर असल्याने ...

भिवंडी :दि.१०- शासन शिक्षणबाह्य मुलांना शालेय वातावरणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असतानाही अनेक स्थलांतरीत मजुरांची मुले शाळेपासून दूर असल्याने महिला व बाल कल्याण विभाग व स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक शाळा सुरू करण्यात आली आहे. भिवंडीत शहरातील कामतघर अंजुरफाटा रस्त्यावरील झोपडपट्टीत श्री साई सेवा संस्था अध्यक्षा डॉ स्वाती सिंह यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या शिक्षणाची गाडी या शाळेचा शुभारंभ शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा महिला विकास व संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी,समाजसेवक विराज पवार,श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती सिंह,बिहार झारखंड सेवा समिती मुंब्राचे एम आय खान ,गायत्री परिवारचे उपेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

स्थलांतरीत मजुरांच्या वस्तीतील मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे त्यासाठी शिक्षण गरजेचे असून शासन योजना बनवीत असली तरी त्यासाठी सेवाभावी संस्थांनी समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी केले .रस्त्यावरील शाळा बाह्य मुलांची जिल्ह्यात शासना तर्फे शोधमोहीम घेतली.त्यांमध्ये जिल्ह्यात १९७६ तर भिवंडी शहरात सुमारे ४५० मुले आढळून आल्याने महिला व बालविकास विभागाने ही संकल्पना जिल्ह्यात राबविली आहे .मुंब्रा,ठाणे व भिवंडी शहरात बस मध्ये बनविण्यात आलेल्या फिरते पथक या वर्गखोलीत शिक्षण दिले जाणार आहे .भिवंडीत गुरुवार,शुक्रवार,शनिवार या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत झोपडपट्टीत येऊन विध्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी दिली.भिवंडी येथील या उपक्रमा श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती सिंह यांनी पुढाकार घेतला आहे.

 

टॅग्स :bhiwandiभिवंडी