शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कल्याणमधील पत्रीपूलाच्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही; शाळेला लागतोय लेटमार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 17:00 IST

बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांचे शिक्षण मंत्र्यांना ट्विट, गोंधळाचा त्रास विद्यार्थ्यांना का?

डोंबिवली: पत्रीपूलावरून सत्ताधारी, प्रशासन यांच्यातआरोप प्रत्यारोप सुरु असतांनाच आता त्या ठिकाणी होणा-या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने त्यांची शाळा अनाठायी बुडत आहे. शाळेत जायला उशिर झाल्याने शाळा प्रशासन देखील विद्यार्थ्यांना शाळेत घेत नसल्याने पालक हैराण झाले आहेत. डोंबिवली एमआयडीसी मधील रहिवासी बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यांच्या पाल्यांना तसा अनुभव आल्याने त्रस्त पालकांनी थेट शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना ट्विट लिहून गा-हाणे मांडले आहे.

गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा कलयाणला शाळेत जायला सकाळी ७ वाजता घरातून निघाला, त्याला पत्रीपूलावर कोंडीला सामोरे जावे लागल्याने त्याला शाळेत जायला काहीसा उशिर झाला. शाळा सकाली ८ वाजून १० मिनिटांची असते, म्हणजे त्याला घरातून शाळेत जायला १ तासाहून अधिक वेळ लागला. त्यात त्या मुलांची चूक काय आहे? जर पत्रीपूलाचे काम वेळेत झाले, तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत झाली तर ही समस्या भेडसावणार नाही. त्यासाठी त्यांनी शेलार यांना ट्विट केले, तसेच पत्र लिहिल्याचे पाटे म्हणाले. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी शाळा प्रशासनाचीही भेट घेत कोंडीच्या कारणाने काही लेट झाल तर मुलांना सूट द्यावी अशी विनंती केली, शाळा व्यवस्थापनानेही अडचण समजून घेतली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु विद्यार्थ्यांनी अजून किती लवकर निघावे आणि शाळेत जावे? वाहतूक कोंडीत अडकल्याने मुलांच्या मानसीकतेवर परिणाम होतो, याचीही शिक्षणमंत्र्यांसह संबंधितांनी नोंद घ्यावी.

आमदार नरेंद्र पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रीपूलाचे काम लष्कराकडे द्यावे अशी लेखी मागणी केली आहे, त्यामुळे तेथे समस्या भेडसावत आहेत हे वास्तव असल्याचे गांभिर्य ओळखून तातडीने उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा डॉ. पाटे यांनी व्यक्त केली. १० किमी अंतर कापण्यासाठी एवढा वेळ लागत आहे, हे योग्य नाही. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे शाळांचे काटेकोर नियम या कचाट्यात विद्यार्थी सापडले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे चांगले नियोजन करून अरुंद पूलावरुन वाहतूक सुटसुटीत करण्यासाठी निदान आगामी काळात गांभीर्याने लक्ष घातल्यास विद्यार्थ्यांची शाळा अनाठायी बुडणार नाही. त्यामुळे पालकांना, पाल्यांना आणि शाळेलाही दिलासा मिळेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSchoolशाळाStudentविद्यार्थीAshish Shelarआशीष शेलार