शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

आठ तासांच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 12:57 AM

उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.

कुमार बडदे मुंब्रा : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मुंब्रा येथील नागरिकांना प्रवासाकरिता आठ तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. या प्रवासामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याने ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. रेल्वेने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची सुविधा दिली आहे. उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.सध्या सुरू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत फक्त अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्यांनाच प्रवास करण्याची सवलत दिली आहे. यामुळे मुंबईतील विविध भागांमधील दुकाने तसेच इतर खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या मुंब्रा-कौसा परिसरातील हजारो कर्मचारी तसेच व्यावसायिक यांना रेतीबंदर येथील चौकातून सुटणाºया बेस्टच्या बसने प्रवास करावा लागत आहे. बेस्टची मार्ग क्रमांक ४९४ ही बस मुंबईतील घाटकोपर बसडेपो पर्यंत धावते. या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे सकाळी बससाठी अर्धा ते एक किलोमीटर रांग लागते. बस सुटण्याच्या ठिकाणी निवाºयाची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना भर पावसात दीड ते दोन तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यामध्ये महिला, वृद्ध आणि मुलांची आबाळ होते. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.>बससाठी दोनदा रांग लावण्याची येते वेळबेस्ट बसने विक्रोळी तसेच घाटकोपरपर्यंत प्रवास केल्यानंतर इच्छितस्थळी जाण्यासाठी पुन्हा दुसºया बसने प्रवास करावा लागतो. त्यासाठी पुन्हा दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागते. परतीच्या प्रवासातही हाच द्राविडी प्राणायाम करावा लागतो. यामुळे प्रवासासाठी दररोज आठ तास खर्च करावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासात वेळ खर्च होत असल्याने त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होत असल्याची तक्रार मोहम्मद साजिद आणि मोहम्मद अब्बासी या प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली.