शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Published: April 14, 2023 5:55 PM

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती.

ठाणे : जे ५० खोके करतात पण आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटींपेक्षा अधिकचे वाटप म्हणजेच मदत केली असून हे आम्ही आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, जनताच आता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील पुतळ्याला देखील त्यांनी अभिवादन केले. यानंतर आनंद आश्रम येथे शेतकरी लॉंग मार्च दरम्यान निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुबियांना ५ लाखांची आर्थिक मदत केली. यावेळी पत्रकरांशी बोलतांना त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

दरम्यान शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबियांना कोणत्याही प्रकारे वाºयावर सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक हे जागतिक दर्जाचे असेल, जगाला हेवा वाटेल असे ते असणार असून परदेशातील लोक हे स्मारक बघायला येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  आमदार बोरणारे बाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच गृहखाते देखील यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील दोन ते अडीच वर्षात केवळ दोन ते अडीच कोटींचेच वाटप झाले. मात्र मागील आठ महिन्यात आम्ही आरोग्य सेवेतून ५० कोटीहून अधिकचे वाटप केले आहे. त्यामुळे ५० खोक्यांचा आरोप करणाºयांना हे चोख उत्तर असल्याचेही त्यांनी सांगितले.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान महाराष्टÑ राज्य किंवा देश सहन करणार नाही, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध यात्रा व सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी सावरकर गौरव यात्रा काढलेली आहे. परंतु सावरकरांचा अपमान हा देश कदापी सहन करणार नाही असा इशाराच त्यांनी राहुल गांधी यांना दिला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यां त्यांची जागा दाखविल्याशिवाय महाराष्टातील जनता गप्प बसणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट हे लोकशाहीचे राज्य आहे, त्यामुळे आमच्या विरुध्द बोलणारे, सावरकरांच्या विरोधात बोलणारे जेलमध्ये गेले असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपालांच्या बदली बाबत त्यांना विचारले असता सकाळीच ते आपल्याला भेटले आहेत.

त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बाबत आरोग्य विभागाने बैठक घेतली आहे, टास्कफोर्स काम करीत आहे. कोरोनाचा धोका नसला तरी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.