शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

एकनाथ शिंदे वापरतात आयआरबीच्या उपकंपनीची गाडी; मनसे जिल्हाध्यक्षांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 19:36 IST

टोलबंदी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले शिवसेना- भाजपाचे सरकार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.

अंबरनाथ : टोलबंदी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले शिवसेना- भाजपाचे सरकार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे आयआरबी या टोल वसूल करणा-या कंपनीच्याच उपकंपनीची गाडी वापरत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. राज्याचे मंत्रीच असा प्रकार करीत असतील तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथमध्ये एसबी या कंपनीत मराठी कामगारांना कामावरून काढल्याने या कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत होती. या कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय होत असल्याने या कंपनी विरोधात मनसेने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चानंतर अविनाश जाधव यांनी सरकारवर आरोप करून पालकमंत्र्यांनाच अडचणीत आणले आहे. पालकमंत्री शिंदे हे ठाण्यात फिरताना जी गाडी वापरतात ती गाडी टोल वसूल करणारी आयआरबी कंपनीचीच उपकंपनी असलेल्या मॉडर्न रोड मेकर्स या कंपनीची आहे. राज्यभर जी आयआरबी कंपनी टोल वसूल करते त्याच कंपनीची उपकंपनी असलेल्यांची गाडी वापरत असले तर त्यात भ्रष्टाचारच म्हणावे लागेल, असा आरोप जाधव यांनी केला. राज्यात टोलनाके बंद करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.मात्र टोलवसुली तर सुरूच असून त्या टोलच्या मोबदल्यात आपला स्वार्थ साधण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. शिंदे वापरत असलेली एमएच 04 एस जे 3366 या गाडीची नोंदणी ही खासगी कंपनीच्या नावावर आहे. खासगी कंपनीच्या नावावर असलेली गाडी पालकमंत्री वापरत असतील तर त्याची त्यांना कल्पना असेलच असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात पालकमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की ती गाडी आपल्याला शासनामार्फत आलेली आहे. शासनाच्या एमएसआरडीसीएकडून आलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.