शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
2
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
3
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
4
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
5
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
7
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
9
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
10
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
11
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
13
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
14
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
15
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
16
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
17
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
18
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
19
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
20
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?

राष्ट्रवादी बाबत निर्णय घेताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल : आव्हाड

By नितीन पंडित | Published: September 09, 2023 7:52 PM

शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते.

भिवंडी: शिवसेने बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. निवडणूक चिन्ह व पक्ष असे देता येत नाही, त्यासाठी काही चाचणी घेणे गरजेचे आहे, संघटन तपासणे महत्वाचे आहे नुसते आमदार म्हणजे पक्ष नव्हे असे सर्वोच्च न्यायालयच्या निकालात म्हंटल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निकाल देताना निवडणूक आयोग काळजीपूर्वक वागेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

शनिवारी ते भिवंडी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतसाठी पडघा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष गणेश गुळवी, महेंद्र पाटील, सुरेश पवार, देविदास पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेने तब्बल २४ लाख अफीडेव्हिट सादर केले होते.ते विचारात न घेता फक्त आमदार विचारात घेणे चुकीचे आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या टिपणीत म्हंटल आहे .याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विरोध केला आहे असा होतो.हा  निकाल निवडणूक आयोगाचा आहे. सर्वोच्च न्यायालय तो काढून घेणार आणि पक्ष पुन्हा शिवसेनेला बहाल करणार असे सांगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबत निर्णय देताना निवडणूक आयोग सद्सदविवेक बुध्दीचा वापर करेल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संविधान बनले असून त्यानुसार पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात . प्रत्येक वेळी पक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची निवड झाली. त्याची माहिती प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाला कळवण्यात आले आहे.अचानक एका दिवशी एखादा माणूस पक्ष माझा आहे असं बोलल्याने पक्ष कधी कोणाचा होऊ शकत नाही.त्यांचे नेते आधीपासूनच सांगत आहेत की पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे राहणार त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती बाबत शंका निर्माण होत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

 आम्ही आमची न्यायाची बाजू मांडलेली आहे.काहींनी पक्षविरोधी कारवाया केल्या पक्ष फुटलेला नाही आमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यांमध्ये आहे तेथे अशी कोणती फूट झालेली नाही त्यांनी जे दावे केलेले ते खोडून आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत.मला विश्वास आहे की निर्णय आमच्या बाजूनेच लागेल ज्या दिवशी फूट झाली त्यादिवशी पक्षाच संविधान आमच्या बाजूने होते.शिवसेने बाबत दिलेल्या निकाला वरून बाबत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाल सुनावले आहे, त्यामुळे अशी टोकाची भूमीका निवडणूक आयोग घेणार नाही असे वाटते असेही आव्हाड यांनी शेवटी सांगितले.