शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

इलेक्शन आठवणी : गेले ते दिन गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:33 IST

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता.

देशात निवडणूक सुधारणा लागू करून टी.एन. शेषन यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या असल्या, तरी निवडणुकीतील कल्पकता मात्र संपुष्टात आणली. एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ घाटकोपरपासून पुढे दूरवर पसरला होता. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे स.गो. बर्वे हे दोनवेळा विजयी झाले. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे मुकुंदराव आगासकर हे त्यावेळच्या जनसंघाचे उमेदवार तिसऱ्यांदा जेव्हा रिंगणात उतरले, तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर एक घोषणा रंगवली होती. ‘मुकुंदा, मुकुंदा पडणार कितींदा एकदा, दोनदा की तीनदा?’ बर्वे विजयी झाल्यावर काँग्रेसची मंडळी कल्याणमधून त्यांची शोभायात्रा काढायचे कारण हा परिसर जनसंघाचा बालेकिल्ला मानला जायचा. याच मतदारसंघातून शिवसेनेने लष्करातील पहिले भारतीय जनरल करिअप्पा यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्यांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चा नारा दिला असताना कानडी करिअप्पांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जनसंघाच्या मंडळींना सेनेला डिवचण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे भिंतीवर घोषणा रंगली की, ‘मराठी माणसाच्या मारता गप्पा, आता कशाला हवा करिअप्पा’. याच करिअप्पा यांच्या मिरवणुकीत एक गडबड झाली होती. त्यामुळे ठाण्याचे तत्कालीन डीसीपी लोणे यांनी लाठीमार करून गडबड करणाऱ्यांना चोप दिला होता. तेव्हा कल्याणमध्ये चर्चा झाली होती की, लोणेसाहेब, मारायचे तर काठीला लोणी लावून तरी झोडायचे. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रंगवलेली घोषणा अशीच कल्पक व चिरकाळ स्मरणात राहील, अशी होती. वा रे इंदिरा तेरा खेल, सस्ता बेवडा, महंगा तेल... त्यावेळी खाद्यतेल महाग होती आणि दिवाळीत तेल गायब होत असे. ते टंचाईचे दिवस आता उरले नाहीत. भिंती रंगवून निवडणुका लढणे राहिले नाही आणि अशा कल्पकतेचे कार्यकर्तेही उरले नाहीत.

टॅग्स :Electionनिवडणूक