शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
2
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
3
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
4
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
5
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
6
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
7
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
8
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
9
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
10
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
11
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
12
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
13
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
14
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
15
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
16
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
17
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
18
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
19
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
20
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

कल्याण स्थानकाबाहेरील कोंडी फोडण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:43 AM

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ- सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आता शिस्त लावण्यात ...

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ- सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आता शिस्त लावण्यात येणार आहे. यात रांग सोडून प्रवासी भाडे घ्यायचे नाही; अन्यथा १ सप्टेंबरपासून कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याणचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी रिक्षाचालकांना दिला आहे. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत येथे लोखंडी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहे, तर दुसरीकडे सोमवारपासून खासगी कंपन्यांच्या बसना स्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे जंक्शन असल्याने सार्वजनिक वाहनांसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी यासह लगतच्या ग्रामीण परिसरातून हजारो खासगी वाहने स्थानक परिसरात दर तासाला येत असतात. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारा लोंढाही मोठ्या प्रमाणात आहे. यात रस्त्यात बसणारे फेरीवाले, अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा परिणामी स्थानकातून बाहेर पडताच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रिक्षा स्टॅण्ड, टांगा स्टॅण्ड आणि बसस्थानक हे रेल्वेस्थानकाच्या परिसरातच असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. दरम्यान, स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्थानक परिसरातील विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या ठिकाणच्या बेकायदा टपऱ्या व फेरीवाले दोन वर्षांपूर्वी हटविण्यात आले होते; परंतु फेरीवाल्यांच्या अतिक्रमणासह वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

दुसरीकडे रांगेत भाडे न घेणाऱ्या रिक्षाचालकांकडून कोंडीची समस्या निर्माण होतेच त्याचबरोबर वादावादीचे प्रकारही वारंवार घडतात. दरम्यान, आता वाहतूक पोलिसांनी अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करणाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेव्यतिरिक्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. प्रवाशांनीही बॅरिकेडसच्या बाहेरील रिक्षात बसू नये. आतील रिक्षातूनच प्रवास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

--------

खाजगी बसना स्थानक परिसरात मनाई

खासगी कंपनीच्या बसना सोमवारपासून रेल्वेस्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. दुर्गाडी येथेच त्या बस गोविंदवाडी बायपासमार्गे वळवून पत्रीपूल, पुढे एपीएमसी मार्केट, शहनाई हॉल येथे त्या पूर्णपणे थांबविल्या जातात. त्याठिकाणी यू टर्न घेऊन पुन्हा आल्यामार्गी त्या शहराबाहेर पाठविल्या जातात. परिणामी, सहजानंद चौक आणि शिवाजी चौक, तसेच स्थानक परिसरातील कोंडी ९० टक्के कमी झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. दरम्यान, असा प्रयोग डोंबिवलीतही झाला होता; परंतु नंतर तो बारगळला. त्यामुळे कल्याणचा प्रयोग यशस्वी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------