शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रणरणत्या उन्हातही मतदानाचा उत्साह, काही भागांत बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी

By नितीन पंडित | Published: May 21, 2024 2:08 PM

...मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी पूर्व, पश्चिम, ग्रामीण,शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात नागरिकांनी उत्साहात मतदान केले. रणरणत्या उन्हातदेखील नागरिकांनी लांबच लांब रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्याने अनेक मतदारांचा हिरमोड झाला. काही भागांत बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीवरून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील हे संतप्त झाले. मागील निवडणुकीत भिवंडीत ५३.०५ टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४९.४३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे भिवंडीत मागील वेळेपेक्षा जास्त मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत.भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, भाजपचे कपिल पाटील व अपक्ष नीलेश सांबरे त्यांच्यात लढत होती. पहिल्या दोन तासांत अवघे ४.८६ टक्के मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले. अनेक मतदान केंद्रांवर रांगा लावून लोकांनी मतदान केले. शेवटच्या एका तासात सर्वच मतदार केंद्रांवर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.यादीतून नावे गायबभिवंडी मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे यादीतून गायब असल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. गेली ३० वर्षे मतदान करीत होतो अचानक नावे कशी गायब झाली, असा सवाल नावे गायब झालेले शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, महिलाांनी केला.

बोगस मतदानाचा आरोपउमेदवार कपिल पाटील यांनी शहरातील बाळा कंपाऊंड येथील मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला. ईदगा येथे पाटील पोहोचले असता काही ठिकाणी रसायनांचा वापर करून बोटावरील शाई पुसून लोक मतदान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाटील व त्यांच्या समर्थकांनी याला आक्षेप घेताच नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे पाटील यांनी तेथून काढता पाय घेतला. पाटील यांचा हा आक्षेप विरोधी उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी फेटाळला व पाटील यांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला.तृतीयपंथींचे मतदानभिवंडी परिसरात तृतीयपंथी व देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान