शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
4
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
5
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
6
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
7
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
8
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
9
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
10
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
11
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
12
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
13
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
14
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
15
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
16
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
17
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
18
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
19
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
20
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?

हिरव्या देवाच्या यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:05 AM

Environment: काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनी मुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत  उपस्थितांनी चाखली. 

- आमाेद काटदरे(वरिष्ठ उपसंपादक) 

जंगलात ७० ते ८० फुटांच्या उंच झाडांखाली २०-२५ फुटांपर्यंत वाढणारी करवंदाची जाळी किंवा तत्सम वनस्पतींच्या आच्छादनामुळे जंगलाचे रक्षण होत होते. हरीण, उदमांजर, रानडुकरे, विविध लहान पक्षी, बिबटेही अशा जाळ्यांमध्ये लपतात. हरीण आणि पक्ष्यांचे करवंदे हे खाद्य आहे. परंतु, शेतालगत करवंदाची जाळी असल्यास रानडुकरांमुळे होणारे शेतीचे नुकसान किंवा बिबट्याच्या हल्ल्याची भीती यांमुळे करवंदाच्या जाळ्यांची छाटणी होऊ लागली. पर्यावरणाचा हा ऱ्हास रोखण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी काही संघटना ५ जूनला पर्यावरणदिनीमुरबाड तालुक्यात एका अगळ्या वेगळ्या ‘हिरव्या देवाच्या यात्रे’त एकवटल्या होत्या. यात्रेत करवंदाची भाजी, कढी, ठेचा याची लज्जत  उपस्थितांनी चाखली. 

निसर्गाशी आपले कृतज्ञतेचे नाते दृढ व्हावे, पुढच्या पिढ्यांसाठी निसर्गाचा हा ठेवा टिकावा, वाढावा, याकरिता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आदिवासी-जंगलवासी वनहक्कधारक गावे दरवर्षी पर्यावरणदिनी हिरव्या देवाची यात्रा साजरी करतात. आदिवासी आजही उपजीविकेसाठी जंगल, शेती, सभोवतालच्या पर्यावरणावर अवलंबून आहेत. झाडे, फुले, पाने, माती आदी ते गरजेपुरते वापरतात. परंतु, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली किंवा नफेखोरीच्या हव्यासाने आपण निसर्गातील जीवसृष्टीकडे बाजारू वृत्तीने पाहत आहोत. गरेजेपक्षा अधिक ओरबाडत आहोत. त्याला पायबंद बसावा आणि निसर्गाबाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी या यात्रेची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली. गेली ११ वर्षे विविध गावांत होणाऱ्या या अनोख्या यात्रेत आदिवासींबरोबरच शहरी मंडळीही सहभागी होत आहेत. ही यात्रा आता एका व्यापक चळवळीत रूपांतरित होऊ पाहतेय.

यंदाही ५ जूनला श्रमिक मुक्ती संघटना, वननिकेतन, अश्वमेध प्रतिष्ठान आणि ‘इन्टॅक’ ठाणे चॅप्टर यांच्या सहकार्याने ही यात्रा मुरबाडच्या मोहवाडी (वैशाखरे) येथे उत्साहात साजरी झाली. दरवर्षीप्रमाणे आदिवासी महिलांसाठी रानभाज्या संकलन, त्यांच्या पाककृती स्पर्धा, पारंपरिक नृत्येस्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. मात्र यंदाची यात्रा प्रामुख्याने ‘करवंद’ या संकल्पनेवर आधारित होती, अशी माहिती श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे आणि ‘अश्वमेध’चे अविनाश हरड यांनी दिली. जंगलातील वणवे आण कुंपणासाठी होणारी करवंदाच्या जाळ्यांची तोड, यामुळे खालच्या स्तरातील जंगल नाहीसे झाल्याने पर्यावरणाची हानी झाली. पर्यावरणाच्या पुनर्स्थापनेसाठी अशा वनस्पतींची आवश्यकता आहे. ५० वर्षांपूर्वी मानद वन्यजीव रक्षक लालू दुर्वे यांनी करवंदांच्या जाळ्या कमी होत असल्याने पर्यावरणाच्या बिघडणाऱ्या संतुलनाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

जांभळाएवढी करवंदं मुरबाडमधील ऐतिहासिक सिद्धगड किल्ल्याच्या परिसरात जांभळाच्या आकाराएवढी करवंदे आढळतात. ती पिकल्यानंतरही हिरवीगार असतात. करवंदाच्या प्रजाती जतन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आदिवासी महिलांनी रानभाज्यांबरोबरच करवंदांचे अंबील, लोणचे, हिरव्या करवंदाची लसूण घालून केलेली भाजी, कढी, ठेचा, ज्यूस, अशा पौष्टिक पाककृती आणल्या होत्या. ज्यूस, लोणचे दीर्घकाळ टिकत असल्याने त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, याकडे आदिवासींचे लक्ष वेधण्यात आले. करवंदं तसेच काळू नदीवर आधारित सादर झालेली गाणी आणि लोकगीतांनी सर्वांचे मनोरंजन केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणmurbadमुरबाड