शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

आरतीचा रस्त्यात जीव गेल्यावरही रोहित तिच्यावर वार करतच होता; एकतर्फी प्रेमातून भयंकर घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 06:26 IST

प्रियकराने दिवसाढवळ्या केला हल्ला; मदत करण्याऐवजी लोकांनी केले चित्रीकरण.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसईच्या गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जाणाऱ्या २२ वर्षीय आरतीची प्रियकर रोहितने मंगळवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास भर रस्त्यात लोखंडी पान्याने १५ ते १६ वार करून निर्घृण हत्या केली. सहा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीच्या वागण्यावर रोहितला संशय होता. त्यांचा ब्रेकअप झाला होता. आरतीवर हल्ला होताना रस्त्यावरील लोक बघत होते. कोणीही या नराधम तरुणाला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. मदत करण्याऐवजी काहींनी या घटनेचे चित्रीकरण केले. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. तिच्या वागण्यावर संशय असल्याने दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यातून  रोहित रामनिवास यादव (वय २९) याने रागाच्या भरात आरती रामदुलार  यादव (वय २२) हिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

आरोपीने आरतीच्या डोक्यावर मागून लोखंडी पान्याने हल्ला केल्यामुळे ती रस्त्यात कोसळली. त्यानंतर तो तिच्यावर वार करीतच होता. मृत्यू झाल्यानंतरही तो तिच्यावर वार करतच होता.

तो मृतदेहाजवळ राहिला बसूनआरती जमिनीवर कोसळल्यानंतरही माथेफिरू रोहित तिच्यावर वार करीत होता. हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळच बसून होता. वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरतीचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठविला आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्या मुलीला दुसरा मुलगा भेटल्याच्या संशयातून व रागाच्या भरात आरोपीने ही हत्या केल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.     - पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२

लोक बघ्याच्या भूमिकेत धक्कादायक म्हणजे, आरतीवर हल्ला होत असताना रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. रस्त्यावर लोक येत-जात होते. अनेक जण गाड्या उभ्या करून पाहत होते, तर काहींनी या घटनेचे चित्रीकरणही केलेे. एका तरुणाने रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याच्याकडे लोखंडी पान्हा रोखल्याने तो मागे हटल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. 

...तर आरतीचा जीव वाचला असता

आरती यादव हिचा मोबाइल तिचा प्रियकर रोहित यादव याने ८ जून रोजी फोडला होता. त्यानंतर हा वाद आचोळा पोलिस ठाण्यात पोहोचला होता, मात्र, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई न करता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यावेळीच योग्य कारवाई झाली असती तर आरतीचे प्राण वाचले असते, असा आरोप मृत आरतीची बहीण सानिका हिने केला आहे. 

ही घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सखोल तपास करून न्यायालयातसुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, या दृष्टीने निर्देश दिले आहेत.- देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री व उपमुख्यमंत्री 

"आम्ही कारवाई सुरू केली होती"

८ जूनला रात्री नालासोपारा येथील शिर्डीनगर परिसरात आरतीचा मोबाइल रोहितने फोडला होता. नुकसान भरून दे, असा आग्रह तिने धरला होता. तेव्हा रोहितने नकार दिल्यावर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला, पण दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले नाही. त्याच रात्री आरती बहिणीसोबत पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आल्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला होता. ९ जूनला सकाळी रोहितला बोलविण्यात आल्यावर तो हजर झाला होता. १२ वाजेच्या सुमारास आरती बहिणीसोबत पोलिस ठाण्यात आली. रोहितला पोलिसांनी खाक्या दाखविताच आरतीने पोलिसांना थांबविले. आमचे आम्ही मिटवून घेऊ, असे तिने सांगितले. तरी १४९ ची नोटीस देऊन कारवाई सुरू केली.- बाळासाहेब पवार,वरिष्ठ पोलिस निरीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट