शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोविड काळातही ऑनलाइन पूजाविधीला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ऑनलाइन व्यवसायांना, व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत असले, तरीही धार्मिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ऑनलाइन व्यवसायांना, व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत असले, तरीही धार्मिक पूजाअर्चा मात्र डोळसपणे गुरुजींच्या उपस्थितीत करण्यावर बहुतांश यजमानांचा भर असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी कोणताही गाजावाजा न करता शासन नियमानुसार श्राद्ध, सत्यनारायण पूजन, मंत्र जप, देवीकवच पठण, रुद्र, लग्न, मुंज यांसह विविध प्रकारच्या शांती, गृहप्रवेश, सीमंतीपूजन आदी करण्यासाठी प्रत्यक्ष गुरुजी येऊन साग्रसंगीत विधीवर भर दिला जात आहे. मोजक्या नातेवाइकांना बोलावून, पण शास्त्रोक्त, परंपरागत, संस्कृतीला धरून सर्व उपक्रम करण्याकडेच नागरिकांचा अद्याप कल दिसून येत आहे.

उच्चशिक्षित वर्गात अतिशय अल्प प्रमाणात ऑनलाइन विधीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कोविड पसरायला सुरुवात झाल्यानंतर काही महिने नागरिकांनी ऑनलाइनचा पर्याय वापरला. मात्र काही काळ असाही होता, की ज्यावेळी कोणतेच विधी न करता लोकांनी अनलॉकची प्रतीक्षा केली. अनेकांनी लग्न, मुंज, पूजा, शांती पुढे ढकलली. काहींनी अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीत गुरुजींसमोरच पिंडदान, श्राद्धविधी पूर्ण केला.

------------

कुठले विधी होत आहेत ऑनलाईन

खरे तर ऑनलाइनला फार प्रतिसाद नव्हताच; पण ज्यांनी मार्ग निवडला त्यांनी लग्न सोडून अन्य सगळ्या पूजा केल्या. त्यात इंटरनेटचा अडथळा, मोबाइल हँग होणे, वीज खंडित होणे, सोपस्कार समजावून न सांगता येणे असे अडथळे आले. त्यामुळे मुहूर्त टळण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी जे ऑनलाइन इच्छुक यजमान होते, त्यांचे विधीपेक्षा वेळेकडे जास्त लक्ष असल्याने यथासांग पूजा, समाधान मिळू शकले नाही, असेही सांगण्यात आले.

-------------------

पुजेला आले तरी मास्क

ऑफलाइन विधीलाच नागरिकांनी पसंती दिली. त्यामुळे यासाठी गुरुजी सोसायटीत, घराघरांत जाताना त्यांना नियम पाळावे लागत होते, गुरुजी स्वतःची सुरक्षा लक्षात घेऊन यजमानांना मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक शक्यतोवर पूजन होत असताना तिथे न येणे, धूप, उदबत्ती आदी धुरामुळे कोणाला श्वासाचा त्रास होत असल्यास त्यांनी पूजेच्या ठिकाणी न बसणे, सॅनिटायझरपेक्षा साबणाने हात स्वच्छ करणे, तसेच गरम पेय घेण्यावर गुरुजींचा भर दिसून आला. स्वतःचा पंचा, नॅपकिन किंवा यजमानांकडून पेपर नॅपकिन घेऊन काळजी घेतली गेली.

------------------

मुळात ऑनलाइन पूजाविधीचे प्रमाण कमी होते. कोविड असला तरी गुरुजींना घरीच बोलावून पूजा करण्यावर भर देण्यात आला होता. जे बाहेरगावी होते, किंवा ज्यांचे नातेवाईक परदेशी राहत होते अशा काहींनीच ऑनलाइन पूजेला प्राधान्य दिले; पण ते प्रमाण अल्प होते. त्यातही उच्चशिक्षित नागरिकांचा यात प्रामुख्याने समावेश होता.

ल. कृ.पारेकर, गुरुजी, डोंबिवली

----------------

कोविड काळातही प्रत्यक्ष पूजा करण्यासाठी बोलावणे येत होते. गणेशोत्सव काळातदेखील ऑनलाइन मागणी येईल असे वाटले होते; परंतु तसे झाले नाही. यजमानांनी घरी बोलावूनच गणेशाची पूजा करायला लावली. श्रावणातही तेच झाले. नवरात्रातदेखील घरोघरी बोलावणे होते. फक्त पूजेला नेहमीप्रमाणे गर्दी नसायची. अर्थात आम्हीदेखील नियम पाळूनच पूजाअर्चा केली. लग्नदेखील शासन नियमानुसारच असावेत याकडे गुरुजी म्हणून आम्ही उपस्थितांची संख्या निश्चित करूनच विधी पूर्ण केले.

विजयकुमार भगत, गुरुजी, डोंबिवली