शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

लाखोंचं घर घेऊनही पाच वर्षे प्यायला पाणी नाही;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:29 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिकांची ग्राहकांना विक्री करताना विविध सुख-सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिकांची ग्राहकांना विक्री करताना विविध सुख-सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षात धड प्यायला पाणीही उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे संतप्त सदनिकाधारकांनी एका बिल्डरच्या ऑफिसला बुधवारी टाळे ठोकत घोषणाबाजी केली. तसेच अंबरनाथमध्ये घर घेत असाल, तर फसवणूक करणाऱ्या विकासकांपासून सावधान... असा प्रचारही त्रस्त सदनिकाधारकांनी सुरू केला आहे.

येथील सदनिकाधारकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्यासाठी पाणीच नसून दरवर्षी मात्र पावसाळ्यात अनेकदा पाणी साचून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील चार वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून अद्याप पाणी नागरिकांना उपलब्ध झालेले नाही, सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी, गढूळ आणि पिवळे पाणी नागरिकांना पुरवण्यात येत आहे.

अंबरनाथ शहरातील शिवमंदिरच्या मागील बाजूस काही वर्षात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याठिकाणी चार ते पाच हजार नागरिकांची लोकवस्तीही आहे. बहुतांश नागरिकांनी कर्ज काढून याठिकाणी घरे खरेदी केली आहेत. परंतु त्या घरात राहण्यासाठी आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले आहे. मागील पाच वर्षांपासून नागरिकांना पिण्यासाठी पाणीच नाही. नागरिकांना पाणी लगेच देऊ. असे आश्वासन विकासकाने दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून बोअरिंगचे फिल्टर केलेले पाणी आणि टँकरचे पाणी बिल्डर नागरिकांना पाजत आहेत.

एवढेच नव्हे, तर टोलेजंग इमारतीचे बांधकाम करताना बिल्डरांनी आपल्या फायद्यासाठी मोठमोठे नाले अरुंद केल्याने दरवर्षी अनेक इमारतीत पाणी साचून तलावजन्य परिस्थिती निर्माण होते. याला जबाबदार कोण, बिल्डर की नगरपालिका, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला. मनसेचे शहर उपाध्यक्ष अजय पाटील यांनी याविरुद्ध आवाज उठवला असून, बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

--------