शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतकरी आले रस्त्यावर; आठवडे बाजार झाला कायमचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:23 IST

सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला.

मीरा रोड : सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला. पालिकेने तसे पत्रच काढल्याने रविवारी नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले. यामुळे त्यांना रस्त्यावर बसून भाजी विकण्याची वेळ आली.रामदेव पार्कमागील ठाकरे मंडई व हॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या आधीपासून मुख्यमंत्र्यांच्याच संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार योजने अंतर्गत पणन विभागाच्या मंजुरीने येथे दर रविवारी शेतकरी आठवडे बाजार भरत होता. परंतु पालिकेने मंडई आणि शॉपिंग सेंटरच्या आरक्षणात बेकायदा हॉल बांधून तळ मजल्यावरील मंडई व दुकानेही कंत्राटगारास दिल्यापासून आवारातील मोकळ्या जागेत बसणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने हुसकावुन लावण्याचा खटाटोप पालिका आणि सत्ताधारी भाजपाने चालवला होता. त्यासाठी आयुक्तांनी बांधकाम विभागाचा प्रस्ताव महापौर डिंपल मेहतांकडे दिल्यावर त्यांनी महासभेत आणला व शेतकरी आठवडे बाजार बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. ठराव झाल्यानंतर कंत्राटदार तसेच पालिकेने गेल्या रविवारीही शेतकºयांना हुसकावून लावले होते.गेल्या शुक्रवारी तर कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी पत्र काढून ठाकरे मंडईतील बाजार बंद करावा असा फतवा शेतकºयांना काढला. त्यामुळे रविवारी पहाटे नाशिकहून आलेल्या शेतकºयांना पालिकेने आवारात घेतलेच नाही. त्यामुळे बिचाºया शेतकरयांना रस्त्यावरच आपला आणलेला भाजीपाला विकण्यास बसण्याची वेळ आली. परंतु येथील स्थानिक रहिवाशांसह विविध संघटनांनी मात्र शेकतºयांचा आठवडे बाजार बंद करू नये अशी मागणी सातत्याने चालवली आहे. चांगला आणि माफक दरात भाजीपाला मिळत असताना कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आठवड्याच्या अर्ध्या दिवसाकरिताही जागा पालिका व सत्ताधारी शेतकºयांना देत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.पालिकेने पदपथावर दिली शेतकºयांना जागाएकीकडे पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करायचे असताना पालिकेने चक्क शेतकºयांना कनकिया व मॅक्सस मॉल येथे पदपथावर जागा दिली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMarketबाजार