शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

स्टरलाइट कंपनीच्या भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक; शेतकऱ्यांनी केली निदर्शने

By पंकज पाटील | Updated: May 7, 2023 16:52 IST

स्टरलाईट कंपनीकडून पडघा ते खारघर दरम्यान उच्चदाब वाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ५० ते ५५ गावांमध्ये तब्बल १६०० एकर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

बदलापूर : अंबरनाथ तालुक्यात मुंबई ऊर्जा पारेषण कंपनी म्हणजेच स्टरलाईट कंपनीकडून टॉवर टाकण्यासाठी भूसंपादन केले जाणार आहे. मात्र यात शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अवघ्या ३० टक्के मोबदला देण्याची तयारी कंपनीने दर्शवली असून या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. भूसंपादनाच्या सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्टरलाईट कंपनीकडून पडघा ते खारघर दरम्यान उच्चदाब वाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ५० ते ५५ गावांमध्ये तब्बल १६०० एकर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यामध्ये ९५ टॉवर लावण्यात येणार असून जवळपास २५० शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये संपादित केल्या जाणार आहेत. या जमिनींसाठी शेतकऱ्यांना ३०२५ रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने मोबदला दिला जाणार आहे. मात्र हा दर चालू बाजारभावाच्या अवघा ३० टक्के असून याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. बाजारभावाच्या चारपट दर देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत सरकारी अधिकारी आणि स्टरलाईट कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही त्यांनी आमच्या तोंडाला पाने पुसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळेच शेतकरी हक्क संघर्ष समितीची स्थापना करत या विरोधात आता न्यायालयीन लढा देण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.

आज अंबरनाथ तालुक्यातील चामटोली गावात बाधित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला जमिनीचा योग्य मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी शेतकरी हक्क संघर्ष समितीचे संस्थापक राम पातकर आणि अध्यक्ष बाळाराम कांबरी यांनी केली आहे. आमचा प्रकल्पाला किंवा जमिनी द्यायला विरोध नसून फक्त योग्य मोबदला मिळावा, इतकीच मागणी असल्याची भूमिका यावेळी शेतकरी हक्क संघर्ष समितीने घेतली आहे. चौकट: विद्युत वाहिनीच्या खालची जागा ही अल्प दरात घेण्यात आली आहे या सोबतच विद्युत वाहिनीच्या दोन्ही बाजूला तीस फुटापर्यंतची जागा वापरणे शक्य नसल्याने त्याचाही योग्य मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी