शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

भिवंडीतील काल्हेर कोपर परिसरातील दोस्ती बिल्डर विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

By नितीन पंडित | Updated: December 14, 2024 17:23 IST

राष्ट्रवादी श.प. गटाचे खासदार बाळ्या मामा यांचे बिल्डरच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील कोपर काल्हेर परिसरातील दोस्ती गृप या बांधकाम व्यावसायिकाने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मागील अनेक वर्षांपासून न देता जमिनी बळकावल्या असून स्थानिक शेतकऱ्यांना प्रकल्पात कोणतेही काम मिळत असून उलट शेतकऱ्यांवर गुंडांकरवी दादागिरी केली जात असल्याचा आरोप करत शनिवारी स्थानिक शेतकऱ्यांनी कोपर काल्हेर येथील दोस्ती बिल्डरच्या मुख्य प्रवेश द्वारावर आंदोलन केले. या आंदोलनाप्रसंगी भिवंडी लोकसभेचे खा. बाळ्या मामा दाखल होत त्यांनी बांधकाम व्यावसायिक मालकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवले होते. यावेळी बराच वेळ प्रवेशद्वारावर अडवून ठेवत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या बांधकाम व्यावसायिक मान्य करत नसल्याने संतप्त खासदार बाळ्या मामा यांनी दोस्ती गृप बिल्डरच्या प्रवेश द्वारावर थेट खाली बसून ठिय्या आंदोलन केले.

जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका खा. बाळ्या मामा यांनी घेतली होती. पोलिसांनी खासदारांना विनंती करत आंदोलन स्थगित कारण्याची वारंवार विनंती केली,मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना जमिनींचा मोबदला मिळत नाही,स्थानिक शेतकऱ्यांना काम मिळत नाही व येथील गावगुंडांची दादागिरी थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका खा.बाळ्या मामा यांनी घेतली होती.

तब्बल तीन तास सुरू राहिलेल्या आंदोलना शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला आजच्या बाजारभावा नुसार देणे व स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी काम देणे या मागण्या मान्य केल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.या आंदोलनात असंख्य शेतकरी व स्थानिक नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

येथील शेतकऱ्यांवर दोस्ती बिल्डरने केलेल्या अन्याया विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण या आंदोलनात सहभागी झालो असून बिल्डर ने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या पण आज पर्यंत व्यवहार पूर्ण केलेले नाहीत.शेतकरी काम मागायला गेले की ते त्यांना काम न देता माजी खासदारांच्या बंगल्यावर जाण्याचा सल्ला बिल्डर देत असून,येथे त्यांच्या कुटुंबीयांची गुंडांची दादागिरी सुरू आहे.ज्या शेतकऱ्याने जमीन दिली नाही त्याच्या जागेत जबरदस्तीने माती भराव करून नंतर शेतकऱ्यांना उलट तुमची जमीन कोठे आहे ती दाखवा असा प्रश्न केला जातो.

प्रशासनाची मदत घेऊन गुंडांच्या माध्यमातून बिल्डर दादागिरी करीत आहे,त्याला पोलिस प्रशासन ही मदत करीत असून आम्ही या पूर्वी सुध्दा बिल्डर सोबत चर्चा केली परंतु त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आमच्यावर आंदोलनाची वेळ आली असून आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळे पर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMember of parliamentखासदार