शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा घोडबंदर मार्ग पाण्याखाली जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:30 AM

मीरा रोड : इकोसेन्सेटिव्ह झोन असूनदेखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावामुळे वरसावे नाका ...

मीरा रोड : इकोसेन्सेटिव्ह झोन असूनदेखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावामुळे वरसावे नाका ते काजूपाडादरम्यानच्या घोडबंदर महामार्गावर यंदासुद्धा पावसाळ्यात पाणी साचून रस्ता बंद होण्याची भीती आहे. वाहतूक पोलिसांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली; परंतु मीरा भाईंदर महापालिकेने या पाहणीकडे पाठ फिरवत समस्येबाबत गांभीर्य दाखवले नाही.

वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात. हा परिसर इकोसेन्सेटिव्ह झोन आहे. वरसावे येथील अनुहा लॉजजवळच्या परिसरात प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. येथून महामार्गाच्या खालून जाणारी नैसर्गिक उपखाडी तर भराव करून अतिशय अरुंद केली असून, महापालिकेने तर चक्क काँक्रिटचे बांधकाम करून टाकले आहे.

एक्स्प्रेस इन हॉटेलजवळून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहसुद्धा नावापुरताच उरला आहे. येथील सीएन रॉक हॉटेल परिसरात मातीचा प्रचंड भराव झाला आहे. चेणे येथील लक्ष्मी नदीपात्रातच प्रचंड भराव करून नदीचे पात्र अरुंद बनले आहे. शिवाय परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात भराव झालेले आहेत. इकोसेन्सेटिव्ह झोन तसेच नदी व ओढे आणि परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड भरावामुळे पावसाळ्यात येथील घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जातो. महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. तसेच चेणे गावात पूर येतो.

स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी या भरावा विरोधात तक्रारी केल्या असल्या तरी त्यांना कोणी दाद देत नाही. येथील अजय पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आदेश देऊनदेखील महापालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही.

घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेस पत्र दिले होते; परंतु पालिकेने सदर रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचे वाहतूक शाखेला कळवले. त्याअनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे, उपनिरीक्षक एम. जी. पाटील यांच्यासह ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे वरसावे नाका ते काजूपाडा भागाची पाहणी केली. यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. या दौऱ्यानंतर आवश्यक पावले उचलली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.