शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

गर्दी नसताना चोरट्यांची भीती वाटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:28 AM

ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील रुग्णालयातील एक आरोग्यसेविका म्हणाली, रेल्वे प्रवासात अनेक तरुणी दरवाजात उभ्या राहून प्रवास करतात. त्यामुळे कळव्यासारखी ...

ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर येथील रुग्णालयातील एक आरोग्यसेविका म्हणाली, रेल्वे प्रवासात अनेक तरुणी दरवाजात उभ्या राहून प्रवास करतात. त्यामुळे कळव्यासारखी घटना घडण्याची भीती असते. अनेकदा फेरीवालेही डब्यात शिरतात. मुळात, महिलांच्या डब्यात पुरुष फेरीवाल्या विक्रेत्यांना परवानगी देणे चुकीचे आहे. अनेकदा गर्दीमध्ये ते धक्काबुक्कीही करतात. रात्रीचा तसा वाईट अनुभव नाही. आरपीएफ पोलीस दिवसा नसतात. दोन्ही शिफ्टमध्ये महिला डब्यात पोलिसांना नियुक्ती देणे गरजेचे असल्याचे ही महिला कर्मचारी म्हणाली.

.............................

सध्या मुंबईत लॉकडाऊनमुळे उपनगरी रेल्वेत प्रवाशांची तुरळक गर्दी असते. त्यामुळे भुरट्या चोरांची दहशत निर्माण झाली आहे. कळवा स्थानकात एका महिलेचा मोबाइल एक जण खेचून पळ काढत होता. यात या महिलेला प्राण गमवावा लागला. एकंदरीतच महिलांना प्रवास करताना असुरक्षित असल्याचे जाणवते आहे. कमीत कमी महिलांच्या डब्यात प्रवासादरम्यान आणि रेल्वेस्थानकावर महिलांच्या डब्यासमोर पोलीस कर्मचारी असल्यास सराईत आणि भुरट्या चोरांना दहशत बसू शकेल. यातूनच महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे वैशाली पावडे या अन्य एका प्रवासी महिलेने सांगितले.