शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समन्वयकाअभावी दिल्लीत महाराष्ट्रातून कमी अर्ज, सांस्कृतिक समितीसंदर्भात डॉ. प्रकाश खांडगे आणि नंदेश उमप यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 09:42 IST

उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले.

ठाणे : सांस्कृतिक संस्थांना अनुदान देणाऱ्या केंद्र सरकारच्या केंद्रीय समितीकडे महाराष्ट्रातून फार कमी अर्ज जातात.  महाराष्ट्रात सांस्कृतिक संस्थांचा योग्य समन्वय नसल्यामुळे अर्जांची संख्या अत्यल्प असते, अशी खंत लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी व्यक्त केली. ज्यावेळी या समितीकडे अर्ज येतात, त्यातून इतर राज्यांतील सांस्कृतिक संस्थांचा आणि कलावंतांचा समन्वय पाहायला मिळतो. महाराष्ट्रातून येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा दोघांनी व्यक्त केली. उत्सव ७५ अंतर्गत टाऊन हॉल येथे सोमवारी ‘संगीत आणि लोकसंगीत’ यावर परिसंवाद झाला. यावेळी उमप म्हणाले की, अर्जांची छाननी करताना मणिपूरमधून ७५ अर्ज आले होते. महाराष्ट्रातील केवळ पाच आले. कदाचित मणिपूरमध्ये हेवेदावे नसावे. जे आमच्या महाराष्ट्रात आहेत. एकमेकांना मदत करायला हवी. एवढे मुक्त विचार का नाही? उमप यांच्या दाव्याला दुजोरा देत डॉ. खांडगे म्हणाले की, त्या कमिटीवर मीही आधी होतो. महाराष्ट्रातून किती संस्थांना अनुदान मिळते हे मी पाहिले. त्यावेळी ज्यांनी अर्ज केले त्यापैकी तीन ते चार संस्था बोगस होत्या. ज्येष्ठ गायक पं. सुरेश बापट यांनी सुरुवातीला बंदिशी सादर केली. शास्त्रीय गायिका श्रुती गोखले यांनी आपल्या गायनाचा प्रवास उलगडला. धर्मवीर चित्रपटातील देवीचे गाणे करण्याचा हट्ट मी पकडला होता आणि ते करण्याची संधी मला मिळाली. माझा जन्म या ठाण्यात झाल्याचा मला अभिमान आहे, असे संगीतकार महेश ओगले यांनी सांगितले. 

परिस्थितीनुसार संगीत द्यावे लागते!एखाद्या गाण्याला संगीत देताना थोडीफार तडजाेड करावी लागते. तडजाेड न करता आपण त्यातून शिकू या असा विचार केला तर नवीन शिकायला मिळते. कधी कधी परिस्थितीनुसारही गाण्याला संगीत द्यावे लागते, हे सांगताना टाइमपास चित्रपटाचा किस्सा ओगले यांनी सांगितला.

टॅग्स :thaneठाणे