शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

अखेर....उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात वेतन, कामगार नेत्यांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 5:31 PM

Ulhasnagar Municipal Corporation News : शासन जीएसटी अनुदाना अभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.

- सदानंद नाईक उल्हासनगर -  शासन जीएसटी अनुदाना अभावी महापालिका कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार दोन टप्प्यात देण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बुधवारी दुपारी कामगार नेते दिलीप थोरात यांनी मुख्य लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्या कॅबिन समोर ठिय्या आंदोलन केल्यावर वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याला मान्यता दिल्याची माहिती थोरात यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका आस्थापनाचा दरमहा एकून खर्च १९ कोटी पेक्षा जास्त असून त्यापैकी कर्मचारी पगारावर १२ कोटी खर्च होतो. तर महापालिकेला जीएसटी अनुदानपोटी १६ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळते. दरम्यान मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने, गेल्या महिन्यात २० कोटींची वसुली झाली. शासन अनुदान येण्यास विलंब झाल्याचे कारण महापालिका प्रशासनाने देत महिन्याची १७ तारीख उलटून गेल्यावर पगार झाला नसल्याने, कामगारात प्रचंड असंतोष निर्माण झाला. अभय योजने अंतर्गत वसुली झालेल्या २० कोटीच्या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार का केले नाही?. असा प्रश्न कामगारांकडून करण्यात आला. कर्मचाऱ्यांचा पगार न देता, अभय योजने अंतर्गत जमा झालेले निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारल्यावर, महापालिका प्रशासनाने याबाबत चुपकी साधली. 

कर्मचाऱ्यांचा पगार देण्या ऐवजी महापालिकेने ठेकेदारांची देणी प्रथम दिल्याने सर्वस्तरातून एकच टीकेची झोळ उठली. आखिल भारतीय काँग्रेस मजदूर संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग यांनी कर्मचाऱ्यांचा पगारवेळेत करीत नसेलतर, त्यांच्या पगाराच्या रक्कमेवर ६ टक्के व्याज शासन नियमानुसार देण्याची मागणी टाक यांनी केली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेची कोंडी झाल्यावर, शासनाने जीएसटी अनुदान त्वरित देण्याची मागणी शासनाकडे करावी लागली. तसेच कामगार नेते दिलीप थोरात यांच्या ठिय्या आंदोलनामुळे वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचा निर्णय घेतला. तसेच वर्ग-३ यांच्यासह अधिकारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्त वेतन देणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. महिन्याची १७ तारीख उलटूनही कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने, कर्मचाऱ्यात असंतोष निर्माण झाला होता. तसेच कर्मचारी संघटनेने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यास सुरवात केल्यावर, अभय योजनेचा २० कोटीचा निधी ठेकेदारांच्या देणी देण्यावर खर्च केल्याचे उघड झाले. दरम्यान कर्मचाऱ्यांचा पगार नाही. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यावर महापालिका प्रशासनाने धाबे दणाणले होते. 

अभय योजने अंतर्गत वसूल झालेल्या निधींबाबत संभ्रम

 महापालिकेला मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतुन २० कोटीची वसुली झाली. त्या निधीतून कर्मचाऱ्यांचा पगार देण्या ऐवजी प्रथम थकेदाराची देणी कोणाच्या आदेशानव्हे दिली. याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे. मात्र तसे न होता. त्या निधीतून ठेकेदारांची देणी दिल्याचे बोलले जात आहे. ठेकेदारांची देणी प्रथम दिल्यानेच, कर्मचाऱ्यांचा पगार लटकल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर