शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे बंब पोहोचले उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:56 IST

४५ मिनिटांचा झाला विलंब : मिठाईच्या दुकानाला लागलेल्या आगीची घरांनाही झळ

कल्याण : पश्चिमेतील सिंडिकेट परिसरातील एका मिठाईच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री आग लागली. मात्र, या आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर खड्ड्यांमुळे सुमारे ४५ मिनिटांनी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील वस्तूंचे नुकसान झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, अग्निशमन दलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.सिंडिकेट परिसरातील स्टर्लिंग टॉवर इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला मध्यरात्री २.३० च्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली. मात्र, माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास ४५ मिनिटे लागल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आगीने रौद्ररूप धारण केल्याने झालेल्या धुराने इमारतीचा सातवा मजला गाठला. त्यामुळे, इमारतीमधील रहिवाशांच्या घरात धूर गेल्याने त्यांचा जीव गुदमरला. तसेच, काहींच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. तर, काहींच्या घरांच्या खिडक्याही तुटल्या. उशिरा आल्याबद्दल आम्ही अग्निशमन जवानांकडे विचारणा केली, असता त्यांनी खड्ड्यांमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले, असे इमारतीमधील रहिवासी एन.व्ही. राव आणि फ्रान्सिस जोस यांनी सांगितले. दरम्यान, या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला. आगीचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.अवघ्या १५ मिनिटांत जवान घटनास्थळी - गुंडआगीची वर्दी मिळाल्यानंतर १५ मिनिटांमध्ये अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, त्यांनी आग आटोक्यात आणल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.

टॅग्स :fireआग