शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

बंदी आदेश मोडून फोडले गेले फटाके; ३२ ठिकाणी लागल्या आगी

By धीरज परब | Published: November 13, 2023 11:17 PM

फटाक्यांमुळे तब्बल ३२ ठिकाणी लागल्या आगी

धीरज परब

मीरारोड - वाढलेले हवेतील प्रदूषण व ध्वनिप्रदूषण पाहता मीरा भाईंदर महापालिकेने फटाके फोडण्यासाठी रात्री ७ ते १० हि वेळ निश्चित केली असताना देखील त्याला काडीचे महत्व न देता रविवारी दिवाळी दिवशी बहुतांश लोकांनी सायंकाळ पासून मध्यरात्र उलटून गेल्या नंतर सुद्धा सर्रास कानठळ्या बसवणारे फटाके फोडले . यामुळे मोठे वायू प्रदूषण झालेच पण ध्वनी प्रदूषण होऊन लोकांना त्रास सहन करावा लागला  . तर फटाक्यां मुळे तब्बल ३२ ठिकाणी आगी लागल्या असून त्यात ४ घरांना व एका दुचाकीला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे . 

महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी आदेश काढून दिवाळी निमित्त रात्री ७ ते १० वाजे पर्यंतची वेळ मर्यादा फटाके फोडण्यासाठी दिली होती . त्यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करून रात्री ८ ते १० ह्या दोन तासांची वेळ फटाके फोडण्यास दिली . 

तसे असताना मीरा शहरात मात्र रविवारी दिवाळी दिवशी सायंकाळ पासून मध्यरात्री उलटून गेल्या नंतर देखील कानठळ्या बसवणारे फटाके फोडले जात होते . शहरातील रुग्णालय , शाळा , धार्मिक स्थळं आदी शांतता क्षेत्रात सुद्धा फटाके फोडले गेले . पोलीस वा पालिकेचे कोणीही कारवाई करत नसल्याने मध्यरात्री नंतर सुद्धा फटाके फोडले गेले . 

मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने सर्वत्र घातक धुराचे साम्राज्य पासून अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता . तर अनेकांना मोठ्या आवाजा मुळे त्रास होऊन रात्रीची झोप सुद्धा पूर्ण करता आली नाही . रुग्ण , लहान बाळ, गर्भवती स्त्रिया, वृद्ध आदींना जास्त त्रास सोसावा लागतो .  

तर फटाक्यां मुळे रविवारच्या रात्री तब्बल ३२ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत . त्यात जय अंबे नगर , इंद्रलोक , कनकिया भागातील कांदळवन क्षेत्रात आगी लागल्या . कांदळवनातील ३ ठिकाणीच्या आगी अग्निशमन दलाने विझवल्या . 

फटाक्यां मुळे कचरा वा ज्वलनशील वस्तूं आगी लागल्या . ४ घरांना फटक्यां मुळे आगी लागल्या . सदर आगी ह्या रॉकेट फाटक्या मुळे लागल्या आहेत . त्यातील मीरारोडच्या सिल्वर सरिता भागातील पृथ्वी प्राईड ह्या २२ मजली टॉवरच्या १८ व्या मजल्यावरील सदनिका रॉकेट फटाक्याच्या आगीने मध्यरात्री जळून खाक झाली . मोठी आग लागल्याने इमारतीतील रहिवाश्याना बाहेर काढण्यात आले तसेच वीज पुरवठा खंडित करण्यात आला . अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . यात लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले . भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर फटाक्या मुळे दुचाकी जाळून खाक झाली . 

शासन , कायदे नियम , न्यायालयीन आदेश चे उल्लंघन करून मीरा भाईंदर महापालिकेने शहरात नियमबाह्यरीत्या भर रस्त्या लगत प्रचंड प्रमाणात फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या आहेत . फटाक्यांनी घातक वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होत असताना ते कमी करण्या ऐवजी महापालिकेने व पोलिसांनी सर्रास फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या . त्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करून फटाके फोडण्यासह वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणास तसेच आगी लागून झालेल्या नुकसानीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfire crackerफटाकेthaneठाणे