शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

आधी दंड भरा, नंतर मूळ रक्कम स्वीकारू

By admin | Published: March 17, 2017 6:14 AM

ठाणे महापालिकेने यंदापासून अभय योजना बंद केल्याने थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने यंदापासून अभय योजना बंद केल्याने थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पालिकेने मार्चअखेरपर्यंत करवसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून थकबाकीदारांची यादी त्या त्या प्रभाग समिती क्षेत्रात बॅनरद्वारे जाहीर केली आहे. थकबाकीदारांकडून वसुलीसाठी नाना शकली लढवल्या जात आहेत. परंतु, अभय योजना बंद झाल्याने दंडाची रक्कम कशी भरायची, असा पेच या थकबाकीदारांना सतावू लागला आहे. पालिकेने मात्र आधी दंडाची रक्कम भरा, असाच पवित्रा घेतल्याने थकबाकीदार हवालदिल झाले आहेत. ठामपा क्षेत्रात जकातीपाठोपाठ एलबीटीदेखील बंद झाली आहे. त्यामुळे इतर उत्पन्नाच्या स्रोतांकडून वसुली करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, मालमत्ताकर विभागाला यंदा ४५६ कोटींचे लक्ष्य दिले असून आतापर्यंत ३१५ कोटी वसूल झाल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाने दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम २० कोटींपेक्षा अधिक आहे. महापालिका निवडणूक लागल्याने वसुलीवर परिणाम झाल्याचेही बोलले जात आहे. परंतु, आता शिल्लक दिवसांत प्रत्येक विभागाला टार्गेट देण्यात आले असून वसूल न झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभाग कामास लागला आहे. यात मालमत्ताकर विभागाने ३५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा जुंपला असून पहिल्या टप्प्यात मोठ्यांच्या गळ्याला फास आवळण्याचे काम सुरू झाले आहे. मोठ्यांकडून वसुली झाली, तर छोटे थकबाकीदारदेखील मालमत्ताकर आपोआप भरतील, असा विश्वास पालिकेला आहे. त्यानुसार, जे अधिकचे थकबाकीदार आहेत, त्यांची यादी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करतानाच प्रभाग समितीनिहायदेखील यादी लावण्यात आली आहे. शिवाय, बॅण्डबाजा बारातीचा फॉर्म्युलादेखील आजमावणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. नोटिसा बजावूनही रक्कम न भरल्यास अशांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू झाली आहे. २०१५-१६ मध्ये मालमत्ताकराच्या वसुलीसाठी अभय योजना लागू केली होती. परंतु, दंडाची रक्कम फारशी पालिकेला वसूल करता आली नव्हती. त्यामुळेच यंदा ही योजनाच लागू नसल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. त्यानुसार, ही योजना बंद झाल्याने पालिकेने आपले लक्ष्य दंडाच्या रकमेवर केंद्रित केले आहे. त्यामुळे आता मूळ रक्कम भरायची की दंड, असा पेच थकबाकीदारांना सतावू लागला आहे. (प्रतिनिधी)