शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

आधी स्वबळावर खुर्ची मिळवा; मगच लोकांना शब्द द्या!

By admin | Published: February 16, 2017 5:07 AM

दुसऱ्यांच्या भरवशावर खुर्ची मिळवणाऱ्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. आधी स्वत:च्या बळावर सत्ता मिळवा आणि मग लोकांना शब्द द्या,

ठाणे : दुसऱ्यांच्या भरवशावर खुर्ची मिळवणाऱ्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. आधी स्वत:च्या बळावर सत्ता मिळवा आणि मग लोकांना शब्द द्या, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना मारला. दिवा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.भाजपा-सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यांनी या वेळी समाचार घेतला. भाजपा-सेनेच्या राज्यात मराठी माणसांचे मुंबईत बेहाल झाले. मुंबईत अनधिकृत इमारतींचे जाळे आहे. परंतु, जिथे मराठी माणसे राहतात, तिथेच कारवाई करण्याची हिंमत दाखवली जाते. परप्रांतीयांच्या मतांवर त्यांचा डोळा आहे. म्हणूनच जुहू येथील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी हिंदीत भाषण केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर नावाला गुन्हे दाखल केले जातात. ते जामिनावर लगेच सुटतात. पण मराठी माणूस बेघर होतो. या मराठीजनांना घराबाहेर काढणारे नतद्रष्ट दुर्दैवाने आपलेच आहेत. काँग्रेस-राकाँने जे केले, तोच कित्ता भाजपा-सेना गिरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांची लोकसंख्या दररोज वाढतेय. परप्रांतीयांना वाढू देणाऱ्या लाचारांच्या हातातच येथील महापालिकांची सत्ता आहे. ठाण्यात सर्व प्रमुख पक्षांचे नेते बांधकाम व्यवसायात आहेत. येथील अनधिकृत इमारती त्यांच्याच नावे असल्याचा स्पष्ट आरोप ठाकरेंनी केला. दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर मनसेने आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी तीन महिन्यांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री मात्र हाच प्रश्न सोडवण्यासाठी एक वर्षाची मुदत मागतात. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न योग्य पद्धतीने नाशिक महापालिकेने सोडवला असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. दिवा आणि ठाण्यातील स्थानिक प्रश्नांनाही त्यांनी हात घातला. गेली २५ वर्षे ठाण्याची सत्ता भाजपा-सेनेच्या हाती होती. त्यांच्याच राजवटीत येथील समस्या आणि अनधिकृत बांधकामे वाढल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.भाजपाकडून अपमानास्पद वागणूक मिळते, म्हणून उद्धव ठाकरे पाठिंबा काढण्याची धमकी देतात. वास्तविक, त्यांचा अपमान दररोज होत आहे. शिवस्मारकाच्या जलपूजनासाठी आलेल्या पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. आता आणखी अपमान सहन होण्याची ते वाट बघत आहेत का, असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीबाबत बोलताना ठाकरे यांनी हा प्रयोग फसल्याचा आरोप केला. म्हणूनच, आता पंतप्रधान या विषयावर बोलण्याचे टाळत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)