शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

अजब तुझे सरकार...! उड्डाणपूल ८५ दिवसांपासून बंद; मुदत संपत आल्यावर काढले १६ लाखांचे कंत्राट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 11:23 PM

भिवंडी शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. ७ ) शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने महापालिका प्रशासनाने तब्बल सात कोटी रुपये खर्च करत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हा उड्डाणपूल ११ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी पर्यंत साधारणतः ११३ दिवसांसाठी बंद राहणार असल्याचे ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी काढलेल्या अधिसूचनेत नमूद केले होते. मात्र त्यानंतर दोन दिवस व्यवस्था होऊ न शकल्याने अखेर दोन दिवस उशिराने उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकामामुळे पुला खालील रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास होत आहे. मागील दोन महिन्यांपासून या वाहतूक कोंडीचा त्रास शहरातील नागरिक व प्रवासी सहन करत होते. 

या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून भिवंडी महापालिकेने त्यावेळेस ट्राफिक वार्डनची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. मात्र आता उड्डाणपुलाचा काम पूर्णत्वास येत असतांनाच महापालिकेने उड्डाणपुलाखालील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वार्डनच्या नेमणुकीसाठी तब्बल १६ लाख ३४ हजार १७० रुपयांची निविदा महापालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे उड्डाणपुलाचे काम सुरु झाले त्यावेळेस या निविदा काढणे गरजेचे होते, मात्र उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असतांना महापालिकेने आता ट्राफिक वार्डनची निविदा काढणे म्हणजे भिवंडी महापालिकेचा अजब तुझे सरकार अशी टीका मनपा प्रशासनावर होत आहे. दुसरीकडे पालिका प्रशासनाने अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यां वर कारवाई करण्याची गरज असतांना त्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे