शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भिवंडीतील शिरोळे आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2022 10:40 PM

 यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

नितिन पंडीत 

भिवंडी -  भिवंडी तालुक्यातील शिरोळे येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. उर्वरित सोळा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

 भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या शिरोळे गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील पाच विद्यार्थ्यांना २८ मार्च रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कळवा येथील शासकीय रुग्णालयात या विद्यार्थ्यांना हलवण्यात आले होते. दरम्यान २९ मार्च रोजी ज्योत्स्ना जयवंत सांबर या नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर ३० मार्च ३१ मार्च एक एप्रिल व दोन एप्रिल या सहा दिवसात तब्बल १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे आढळल्याने या विद्यार्थ्यांवर कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या घटनेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली असून २८ मार्च रोजी काही विद्यार्थ्यांनी जेवणानंतर काकडी व त्यानंतर प्लास्टिक पिशवीत मिळणारी बर्फाची पेप्सी खाल्ल्यानंतर ५ विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब व इतर लक्षणे जाणवू लागली होती. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र त्यानंतर त्यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांपैकी ज्योत्स्ना सांबर या नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्या नंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून या घटनेनंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या बालरोग तज्ञांची टीम आश्रम शाळेत दाखल होत त्यांनी सदर घटनेची माहिती घेतली असून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार केले त्याचबरोबर शहापूर येथील प्रयोगशाळेत येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते मात्र सदरचे पाणी पिण्या योग्य असल्याचे प्रयोगशाळेतील अहवालात स्पष्ट झाले आहे त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्रम शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांनी खाल्लेली पेप्सी व अन्नधान्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती भिवंडी तालुका आरोग्य अधिकारी माधव वाघमारे यांनी दिली आहे. या घटनेची नोंद पडघा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.