शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

रस्त्यावरील कामाला वन खात्याचा विरोध

By admin | Published: October 10, 2016 3:40 AM

नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सात किलोमीटर लांबीचा रस्ता ज्या भागातून जात आहे, त्याच्या आजूबाजूला वन क्षेत्र

कांता हाबळे /नेरळनेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सात किलोमीटर लांबीचा रस्ता ज्या भागातून जात आहे, त्याच्या आजूबाजूला वन क्षेत्र आहे. त्यामुळे कर्जत वन विभागाने रस्त्यासाठी बांधण्यात येत असलेल्या गटारांचे काम करण्यास हरकत घेतली आहे. याच घाट रस्त्यातील सहा किलोमीटर भागात माथेरान वन विभागाने रस्त्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे, मग कर्जत वन विभागाची भूमिका एवढी कठोर का? असा प्रश्न नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने उपस्थित केला आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने नेरळ हुतात्मा चौक ते माथेरान दस्तुरीनाका या कामासाठी २७ कोटींचा निधी दिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून घाट रस्त्यात संरक्षण भिंती आणि गटारे बांधण्याचे काम सुरू आहे. या घाट रस्त्यातील जुम्मापट्टी स्टेशन ते घाट सुरू होईपर्यंत असलेल्या भागातील क्षेत्र कर्जत वन विभागाच्या अखत्यारीत आणि उर्वरित क्षेत्र माथेरान-नेरळ वनक्षेत्रपाल यांच्या अखत्यारीत आहे. सध्या आरसीसी पद्धतीची गटारे बांधण्याचे काम एमएमआरडीएने नेमलेला ठेकेदार करीत असून जुम्मापट्टीपर्यंत डोंगराच्या कडेला रस्त्यालगत गटारे बांधून पूर्ण झाली आहेत. तर जुम्मापट्टी धबधबा परिसरात देखील गटारे बांधण्याचे काम सुरु आहेत. नेरळ ते जुम्मापट्टी भागातील संरक्षण भिंतीची कामे पूर्ण होत असून ही कामे चार महिन्यांपासून सुरू आहेत. दीड वर्षात रस्त्याचे रु ंदीकरण आणि डांबरीकरण करून रस्ता सुरक्षित वाहतुकीसाठी पूर्ण करून देण्याची जबाबदारी प्राधिकरणाने ठेकेदारावर टाकली आहे. उन्हाळ्यात आधीच खराब झालेल्या रस्त्याची अवस्था पावसाळ्यातील चार महिन्यांत वाहतूक करण्यायोग्य राहिली नाही. मोठा अपघात होण्याच्या स्थितीत असलेल्या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे, अशी माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांची अपेक्षा आहे.नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या आजूबाजूला वन विभागाचे क्षेत्र आहे. माथेरान-नेरळ वन विभागाने जनतेची सोय व्हावी म्हणून रस्त्याच्या कामाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र कर्जत वन विभागात नव्याने रु जू झालेले वनक्षेत्रपाल अनिल लांडगे यांनी जुम्मापट्टी स्टेशन ते मुख्य घाट या एक किलोमीटर भागातील रस्त्याच्या कामाला विरोध केला आहे. वन विभागाचे एक कार्यालय गेली अनेक महिने घाट रस्त्याचे काम होत असताना विरोध करीत नाहीत आणि त्याच विभागाचे दुसरे कार्यालय कामे थांबवून ठेवत आहे. कर्जत वन विभागाची ही भूमिका विकासाला विरोध करणारी असल्याचे मत नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने व्यक्त केले आहे. ४०० कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न या टॅक्सी व्यवसायावर अवलंबून असून वन विभागाने रस्त्याचे काम अडवून विकास प्रक्रि येस खो घातला आहे, त्यामुळे काम रखडले आहे. कामे रखडल्यास पूर्णपणे नादुरु स्त झालेला रस्ता पाहता वाहतूक बंद करावी लागेल अशी भीती व्यक्त होत आहे.