शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

नेवाळीसाठी चार लाखांची भरपाई

By admin | Published: June 24, 2017 12:31 AM

ब्रिटिशांनी नेवाळीच्या १५ गावातील १,६७५ हेक्टर जागा संपादित केली. त्यासाठी ५०८ शेतकऱ्यांना त्याकाळी चार लाख ७८ हजार १०७ रुपयांची नुकसानभरपाई दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ब्रिटिशांनी नेवाळीच्या १५ गावातील १,६७५ हेक्टर जागा संपादित केली. त्यासाठी ५०८ शेतकऱ्यांना त्याकाळी चार लाख ७८ हजार १०७ रुपयांची नुकसानभरपाई दिली होती. युद्धानंतर जमिनी परत करण्याचे आश्वासन त्यावेळेचे जिल्हाधिकारी फारुकी यांनी दिल्याचे सांगितले जाते. त्याच्या कागदपत्रांकडे सर्वांचे लक्ष आहे. ती कागदपत्रे २९ जूनच्या बैठकीत सादर होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर १९५३ साली सरकारने या जागेपैकी दोन एकर जागा एमआयडीसीला दिली. १९६४ साली सरकारने १४ एकर जागा भाभा अणुसंशोधन संस्थेला दिली. उर्वरित जागा १९८१ साली नौदलाकडे हस्तांतरित झाली. १९८८ साली कोकण विभागीय आयुक्तांकडे या जागेसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावर काही तोडगा निघाला नव्हता. तेव्हापासून शेतकऱ्यांत प्रकल्पांबद्दल चीड आहे. २०१२ साली आघाडी सरकारने उसाटणे येथे ३०० एकर जागेवर एमएमआरडीएचा सामायिक भरावभूमी प्रकल्प उभारण्याचे ठरवले. त्याची सुनावणी शेतकऱ्यांनी उधळूून लावली होती. ही जमीन संरक्षण खात्याच्या खास करून पश्चिम सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नौदलाला महत्त्वाची वाटते. पण युद्धजन्य स्थिती नसल्याने संरक्षण खात्याने तेथे काहीही उभारलेले नसले, तरी तेथील धावपट्टी नष्ट केलेली नाही. भोवतालच्या भागात शेती करण्यासही कधी आडकाठी केली नाही. पण नवी मुंबईच्या विमानतळाला विरोध झाल्यावर नेवाळीच्या जागेचा पर्याय पुढे आला आणि या जागेचे ‘मोल’ साऱ्यांच्या ध्यानी आले. जेव्हा या जागेवर कब्जा-वहिवाट दाखवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा नौदलाने संरक्षक भिंत बांधायला घेऊन आपल्या ताब्यातील जमिनीची हद्द निश्चित करण्याचे काम सुरू केले. ही भिंत बांधून पूर्ण झाली तर आपला हक्क संपुष्टात येईल, या भीतीने आंदोलनाला मोकळी वाट करून दिल्याचे शेतकरी-गावकऱ्यांशी बोलल्यावर जाणवते. फक्त शेतकऱ्यांना ही जमीन कसण्यासाठी हवी आहे, की एनए करण्यासाठी याचे उत्तर देण्यास कोणीच तयार नाही.