शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चार रात्री फक्त पाणी अन् काळोख, मलेशियात अपहरण झालेल्या वैद्यबंधूंनी सांगितली आपबीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 02:58 IST

‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच...

डोंबिवली : ‘व्यवसायानिमित्त मलेशियात गेलो असताना अपहरणकर्त्यांनी आमचे अपहरण करत आम्हाला एका बंद खोलीत डांबून ठेवले. डोळ्यांना व हातापायांना त्यांनी पट्टी बांधली होती. त्यांना आठवण आली तरच ते आम्हाला जेवायला देत होते, अशा बिकट अवस्थेत आम्ही चार रात्री अपहरणकर्त्यांच्या तावडीत होतो. आमची सहीसलामत सुटका होईल, असे आम्हाला वाटले नव्हते; पण आज कुटुंबीयांसोबत असल्याने आम्ही खूश आहोत’ अशा शब्दांत वैद्यबंधूंनी तेथील प्रकार कथन केला.मलेशियामध्ये अपहरण झालेले वैद्यबंधू शुक्रवारी डोंबिवलीतील घरी परतले. त्यानंतर, शनिवारी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘रॉक फ्रोझन फूड’ नावाने फ्रोझन फिशविक्रीचा व्यवसाय कौस्तुभ आणि रोहन वैद्य करतात. या व्यवसायानिमित्त रोहन नेहमी परदेशात जातो. मलेशियातील मीस ली फ्रोझन फूड कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत व्यावसायिक चर्चेसाठी रोहन मलेशियामध्ये जाणार होता. याचदरम्यान, लॅक-किन मरिन कंपनीच्या एका माणसाने त्यांना फोन करून व्यवसायाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली, तसेच व्यवसाय करायचा असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर, मलेशियात आल्यावर भेटून सविस्तर चर्चा करू, असे रोहन आणि कौस्तुभ यांनी त्यांना सांगितले.२ आॅगस्टला मलेशियातील मीस ली फ्रोझन फूड कंपनीच्या अधिकाºयांसोबत वैद्यबंधूंची व्यावसायिक चर्चा संपली. त्यानंतर, ते लॅक-किन मरिन कंपनी चालवणाºया अली नावाच्या व्यक्तीला भेटणार होते. या कंपनीच्या माणसाने वैद्यबंधंूना घेण्यासाठी हॉटेलमध्ये एक मोटार पाठवली; परंतु तेथे जात असताना रस्त्यातच एके ठिकाणी अन्य मोटारीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील पाकीट, सोन्याचे दागिने तसेच मोबाइल काढून घेतले. त्यांचे हातपाय, डोळे पट्टीने बांधले. त्यामुळे नेमके कुठे नेले, हे वैद्यबंधंूना कळले नाही. चार दिवस या दोघांना कोंडून ठेवले होते.अपहरणकर्ते हे आपापसात तामीळमध्ये बोलत होते, तर आमच्याशी इंग्रजीत संभाषण करत होते. अपहरणकर्त्यांनी आमच्याकडे एक कोटीची मागणी केली; परंतु पैसे न दिल्यास कौस्तुभला मारण्याची धमकीही त्यांनी दिली. काळोख असल्याने त्यांच्याकडे नेमकी कोणती शस्त्रे होती, हे आम्हाला समजू शकले नाही, असे त्यांनी सांगितले. अपहरणकर्त्यांनी परत मलेशियासह इतर तीन देशांत पुन्हा यायचे नाही, अशी धमकी देऊन आम्हाला सोडून दिले, असे वैद्यबंधू म्हणाले. या प्रकरणी पुढील तपास मलेशिया पोलीस तसेच ठाणे पोलीस करत आहेत.भारतीय टॅक्सीचालकाने सोडलेअपहरणकर्त्यांनी या दोघांकडील मोबाइल, पाकीट, सोन्याच्या वस्तू घेतल्या होत्या. चार रात्री आणि पाच दिवसांनंतर रात्री ११ च्या सुमारास सिंगापूरच्या दिशेला असलेल्या जोहरबारू रोड महामार्गावर अपहरणकर्त्यांनी वैद्यबंधूंना सोडले. तेथे त्यांनी एका टॅक्सीला हात दाखवला. टॅक्सीचालकाला वैद्यबंधूंनी आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. तो भारतीय होता. त्याने दोघांना त्यांचे वास्तव्य असलेल्या ग्रॅण्ड आर्चेड हॉटेलवर आणून सोडले. यानंतर, मलेशियन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली.रोहन हा व्यवसायाच्या निमित्ताने नेहमी मलेशियात ये-जा करत होता; परंतु लॅक-किन मरिन ही नवीन कंपनी आपल्यासोबत व्यवसाय करण्यास उत्सुक असल्याने कौस्तुभ पहिल्यांदा मलेशियात रोहनसोबत गेला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrimeगुन्हाnewsबातम्या