शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

वसईत स्वाइनचे चार बळी

By admin | Published: July 02, 2017 5:36 AM

विरार शहरात जून महिन्यात स्वाइन फ्लूने चार जणांचे बळी घेतले आहेत. तर १९ जणांना त्याची लागण झाली असून यातील तीन रुग्ण

शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : विरार शहरात जून महिन्यात स्वाइन फ्लूने चार जणांचे बळी घेतले आहेत. तर १९ जणांना त्याची लागण झाली असून यातील तीन रुग्ण वसईतील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत तर बाकीचे मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष नसल्याने रुग्णांना मुंबईत जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.शहरात जून महिन्यात स्वाइन फ्लूची लागण लागली होती. एकट्या जून महिन्यात स्वाइन फ्लूने शहरातील चार जणांचे बळी घेतले. यातील एक रुग्ण नालासोपाऱ्यातील रिध्दी विनायक हॉस्पीटलमध्ये तर तीन रुग्ण मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये विरार येथील एका दीड वर्षाच्या मुलासह नायगाव येथील ७१ वर्षीय पुरुष, माणिकपूर येथील ६० वर्षीय महिला आणि विरार येथील ३० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ३० जूनपर्यंत स्वाइन फ्लूची लागण झालेल्या १९ रुग्णांची नोंद आहे. यातील तीन रु्ग्ण सध्या बंगली येथील कार्डीनल ग्रेशस हॉस्पीटल आणि एक रुग्ण नालासोपारा येथील रिध्दी विनायक हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे. १९ पैकी काही रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. स्वाइन फ्यू अतिशय संसर्गजन्य रोग असल्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची (आयसोलेटेट वॉर्ड) ची गरज असते. त्यासाठी खर्च अधिक असल्याने आणि निगा राखणे महापालिकेच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. महापालिकेच्या मालकीची दोन हॉस्पीटल आणि २१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. याठिकाणी गरोदर महिला, नवजात बालके यांची उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णाला दाखल करून त्याच्यावर उपचार करणे अतिशय जोखमीचे काम आहे. म्हणूनच महापालिकेने स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी औषधाचा साठा उपलब्ध करून ठेवला आहे. त्याचबरोबर स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णाच्या परिसरात जाऊन आरोग्य पथक तपासणी करीत आहे. संशयास्पद वाटल्यास संबंधितांवर औषधोपचार केले जात आहेत. त्याचबरोबर नागरीकांमध्ये जनजागृती करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश प्रजापती यांनी दिली. स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी त्यामुळे मुंबईतील खाजगी हॉस्पीटलमध्ये धाव घ्यावी लागत आहे. म्हणूनच नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असा आजार झाल्यास उपचार करावेत. खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने नागरीकांनी ताबडतोब उपचार सुुरु करावेत, असे आवाहनही डॉ. प्रजापती यांनी केले आहे. स्वाइन फ्यूची तपासणी करण्यासाठी वसईतील सर डी. एम. पेटीट हॉस्पीटल आणि तुळंींज येथील हॉस्पीटलमध्ये पूर्णवेळ इतर सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयसोलेशन वॉर्ड तत्काळसुरू करण्याची गरज या फ्ल्यूची बाधा सर्वसाधारण वस्त्यांतील गोरगरिब रहिवाशांना होते. व ते मुंबईला जाऊन उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने दोन प्रमुख रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करावा, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. ती पूर्ण झाल्यास स्वाईनला पायबंद बसून जनतेलाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.