शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
3
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
4
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
5
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
6
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
7
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
8
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
9
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
11
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
12
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
13
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
14
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
15
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
16
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
17
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
18
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
19
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
20
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण

गणेशोत्सवासाठी मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By नितीन पंडित | Published: August 20, 2022 1:34 AM

केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते.

भिवंडी - सध्या राज्यात सर्वसामान्य नागरिकांचे सरकार अस्तित्वात आले असून यापुढे सर्व सण उत्सव हे उत्साहात व जोमाने साजरे करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांना त्यांची अडचण लक्षात घेत, एकाच ठिकाणी सर्व परवानग्या देण्यात येतील. यामुळे गणेशोत्सव मंडळांना सतरा ठिकाणी हेलपाटे घालण्याची गरज पडणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी भिवंडीत जाहीर केले.

केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ७८ गोविंदा जखमी झाले असून सर्वांची परिस्थिती व्यवस्थित असून सर्व जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्याचबरोबर भविष्यात कुठल्याही गोविंदाला व त्याच्या कुटुंबाला त्रास होणार नाही, यासाठी शासनाने दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला असून जखमी गोविंदांसाठी विमा कवच दिले आहे. त्यामुळे भविष्यात संस्कृती जतनाबरोबरच खेळातील उत्सव गोविंदा पथकांना साजरा करता येईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

तर दीड महिन्यापूर्वी आम्ही ५० थरांची हंडी फोडली असून मुंबई सुरत गुवाहाटी असा प्रवास करत राज्यात सर्वसामान्यांचे सरकार अस्तित्वात आले असून हे सरकार सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम करेल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीEknath Shindeएकनाथ शिंदेGaneshotsavगणेशोत्सव