शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

नाईकांच्या प्रवेशाने अनेक पक्षी मारले जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:58 IST

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आल्यामुळे शिवसेना, भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यात मोठे मासे गळाला लागण्यासाठी दोघांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. गणेश नाईक यांच्या कुटुंबाला भाजपमध्ये घेऊन धक्कातंत्र अवलंबले आहे. आता नाईक यांनी प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही.

- अजित मांडके, ठाणेधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. विरोधी पक्षातील बाकावर बसलेले अनेक इच्छुक आजी-माजी आमदार हे आता शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यात भाजपने गणेश नाईक अ‍ॅण्ड फॅमिलीचा मोठा मासा गळाला लावल्याने त्याचे परिणाम काँग्रेस आणि राष्टÑवादीला येत्या काळात भोगावे लागणार आहे. त्यातही नाईक भाजपमध्ये जाण्याआधीच राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. नाईक यांच्यामुळे केवळ कॉंग्रेस, राष्टÑवादी नाही तर, शिवसेनेच्या तोंडचेही पाणी पळण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपमध्ये मेगाभरती सुरू झाली आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून विरोधी बाकावरील आमदाराला आपल्या पक्षात आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेनेतही आता इनकमिंग सुरू झाले आहे. सागर नाईक आणि संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी, येत्या काही दिवसांत गणेश नाईक जिल्ह्यातील लवाजमा घेऊन जंगी प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. एकेकाळी नाईकांनी संपूर्ण जिल्ह्यावर आपले प्रभुत्व सिद्ध केले होते. आता नव्याने त्यांना ही संधी मिळणार आहे. निमित्त मात्र भाजपचे ठरणार आहे.नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. मागील पाच वर्षांपासूनच नाईकांनी राष्टÑवादीला खड्ड्यांत घालण्याचे कारस्थान रचले असल्याचा थेट आरोपच त्यांनी केला. त्यामुळे आता त्याचा सूड घेण्यासाठीही नाईक यानिमित्ताने सज्ज होत असल्याचे बोलले जात आहे. नाईक यांचा स्वाभिमान दुखावला तर ते काही करू शकतात, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आता आव्हाडांनी थेट त्यांच्या जिव्हारी लागणारे विधान केल्याने येत्या काळात त्याचे पडसाद उमटणार, हे निश्चित. नाईक यांचा पूर्वीपासून ठाण्यासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर तसेच ग्रामीण भागात वरचष्मा आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा त्यांना भाजपमध्ये गेल्यानंतर होणार आहे. जिल्ह्यातील राष्टÑवादीला सुरुंग लावण्याचे काम ते यानिमित्ताने करतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.शिवाय, शिवसेनेलाही येत्या काळात नाईक फॅमिली घाम फोडणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. नाईक यांनी यापूर्वीही पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार हाकला आहे. जनतादरबाराच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे आता भाजपच्या कोट्यातून आमदारकी मिळवल्यानंतर त्यांच्या खांद्यावरच पालकमंत्रीपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. यामागे भाजपची आणखी एक वेगळी रणनीती असल्याचेही बोलले जात आहे. नाईकांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाला खिंडार लावण्याची तयारीही यानिमित्ताने सुरू झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे नाईक तर दुसरीकडे त्यांच्या दिमतीला पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, किसन कथोरे यांची ताकद आली आहे.आता शिवसेनेकडूनही सावध भूमिका घेतली जात असून भाजपची ही खेळी हाणून पाडण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील अनेकांनी रणशिंग फुंकले आहे. केळकर यांच्याऐवजी आपल्याला तिकीट मिळावे, यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला या मतदारसंघात मुळमुळीत आमदार नको असल्याचे बोलले जात आहे. खमक्या वेळप्रसंगी पक्षावर ओढवलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी असलेले नेतृत्व हवे आहे. त्यामुळे त्याची तयारीही यानिमित्ताने सुरू झाली आहे. भाजपच्याच वरिष्ठांनी अशी भूमिका घेतली असल्याने स्थानिक पातळीवरील नारायण पवार, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले यांच्यासह अन्य तिघे या स्पर्धेेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे याचा फायदा घेत शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सुरू केला आहे. त्यामुळे येथे आता शिवसेनेकडून दोन नावांची चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, नाईक यांना हाताशी धरून जिल्ह्यात संपण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेस, राष्टÑवादीला अखेरची घरघर लावण्याची तयारी सुरू झाली आहे. ठाण्यात राष्टÑवादीचे ३५ नगरसेवक आहेत. यामधील आणखी किती नगरसेवक आपल्या गळाला लागू शकतात, याची चाचपणी नाईक कुटुंबीयांकडून सुरू झाली आहे.दुसरीकडे राष्टÑवादीची दुखरी नस पकडून शिवसेनेनेही राष्टÑवादीच्या विद्यमान पाच ते सात नगरसेवकांना शिवबंधन बांधण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, हे नगरसेवक युती होणार की नाही, याचा विचार करत असून त्यानुसार पुढील दिशा ठरवणार आहे.मोठी राजकीय उलथापालथएकूणच येत्या महिनाभरात ठाण्यात अनेक राजकीय उलथापालथी होऊन सर्वाधिक फटका हा राष्टÑवादीलाच बसणार, हे स्पष्ट आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकthaneठाणे